शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Delhi Violence: भयंकर...गटारं, नाल्यात सापडत आहेत मृतदेह; दिल्लीतील वेदनादायी दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 09:11 IST

‘आप’ सरकारतर्फे मदत जाहीर; गटारे, नाल्यांत सापडत आहेत मृतदेह

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत गुरुवारी पूर्ण शांतता होती. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र तिथे तणाव असून, दुकाने, बाजारपेठा, शाळा, बँका बंदच आहेत. लोक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. मृतांचा आकडा ३८ वर गेला असून, जखमींची संख्याही वाढून २५० वर गेली आहे. गटारे व नाल्यांत तसेच ढिगाऱ्यांखाली मृतदेह सापडत आहेत. मात्र गोळीबारात किती जण मरण पावले आणि हिंसाचारात किती जणांचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झालेले नाही. आम्ही अजिबात गोळीबार केलेला नाही, असा दावा पोलिसांनी केला आहे.हिंसाचार रोखण्यात अपयश आलेल्या गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली, तर काँग्रेस नेत्यांच्या प्रक्षोभक भाषणांमुळे हे सारे घडले, असा आरोप भाजपने केला.भाजपने आम आदमी पक्षावरही असाच आरोप केला. त्यातच आपच्या ताहिर हुसेन या नगरसेवकावर आयबी कर्मचाºयाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आपने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली असली तरी आता नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मदत जाहीर केली. मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख, तर गंभीर जखमींना पाच लाख रुपये दिले जाणार आहेत. तसेच खासगी व सरकारी हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्चही सरकार उचलेल. त्या भागांतील सर्व पीडितांना सरकारतर्फे मोफत जेवण देण्यात येणार आहे. मदतीसाठी हेल्पलाइन नंबर जाहीर करण्यात आले असून, त्यावर संपर्क साधावा, आपल्या भागात शांतता व सलोखा ठेवावा, असे आवाहन केजरीवाल यांनी केले.या भागांत सरकारने शांतता समित्या स्थापन केल्या आहेत. खासगी आणि सरकारी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च दिल्ली सरकार ‘फरिश्ते दिल्ली के’ योजनेखाली करणार आहे. हिंसाचार व जाळपोळीत संपत्तीचे नुकसान झालेल्यांना त्यांची कागदपत्रे पुन्हा मिळविण्यासाठी राज्य सरकारतर्फे शिबिर घेण्यात येत आहे. ज्यांची वाहने वा दुकाने जळाली आहेत, त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्य सरकार विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहे. व्यावसायिकांना वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळण्यासाठीही सरकार मदत करेल; तसेच सरकार त्यांना अनुदान देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत ४८ एफआयआर दाखल झाले असून, १३० जणांना अटक झाली आहे; तसेच ५० मोबाइल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियाद्वारे हिंसाचार भडकविल्याचा पोलिसांचा संशय आहे.एसआयटीकडे तपासहिंसाचाराचा तपास दोन विशेष तपास पथकांकडे (एसआयटी) देण्यात आला आहे. गुन्हे शाखेने सर्व प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) पथकाकडे सुपुर्द केले आहेत.आमच्याकडे अनेक फूटेज असून, त्यांची तपासणी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हिंसाचारग्रस्त भागात ३५० शांतता समित्या स्थापन केल्या आहेत.त्यांना दुप्पट शिक्षा द्याहिंसाचारात जे दोषी आढळतील त्यांना दुप्पट शिक्षा द्यावी, असे केजरीवाल म्हणाले. हिंसाचाराला प्रोत्साहन देणे किंवा प्रक्षोभक भाषण करणे यासाठी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. तो कुठल्या पक्षाचा आहे हे पाहू नये. माझ्या मंत्रिमंडळातील कुणी असेल तर त्यालाही सोडू नका. त्यांना थेट कारागृहात पाठवा, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. देशाच्या सुरक्षेशी संबंधित ही बाब असल्याने कुणीही राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.

टॅग्स :delhi violenceदिल्ली