शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Delhi Violence : न्यायाधीशांच्या मध्यरात्री केलेल्या बदलीविरोधात प्रियंका गांधींची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाल्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2020 10:42 IST

Priyanka Gandhi : सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही

ठळक मुद्देसध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाहीन्यायमूर्तींची बदली ही खेदजनक आणि लाजीरवाणी बाब सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे

नवी दिल्ली - दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची मध्यरात्री बदली करण्यात आली. दरम्यान, या बदलीविरोधात काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सरकार न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे, अशा शब्दात त्यांनी न्यायमूर्तींची बदली करणाऱ्या केंद्र सरकारवर टीकास्र सोडले आहे.

न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निषेध करणारे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. त्यात त्या म्हणतात, ‘सध्याच्या वातावरणात न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या ऐन मध्यरात्री करण्यात आलेली बदली तशी धक्कादायक नाही. पण ती खेदजनक आणि लाजीरवाणी बाब आहे. देशातील कोट्यवधी लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मात्र सरकार असे प्रकार करून न्यायाचे तोंड बंद करू पाहत आहे.’

दरम्यान,  दिल्लीत सुरु असणाऱ्या हिंसाचाराबाबतच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली दिल्ली हायकोर्टातून पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनमधून न्यायाधीश एस. मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना जारी करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर न्यायाधीश एस, मुरलीधर यांची बदली पंजाब हरियाणा हायकोर्टात केली. माहितीनुसार सुप्रीम कोर्टाच्या समितीने १२ फेब्रुवारीला दिल्ली हायकोर्टातील न्यायाधीश एस मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात करण्याची शिफारस केली होती. 

संबंधित बातम्या 

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

Delhi Violence : आग का क्या है, पल दो पल मे लगती है..., राहत इंदौरींचा भावुक शेर

Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचारावर रोहित शर्मानं व्यक्त केली चिंता, म्हणाला...

 नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारामुळे जखमी झालेल्या व्यक्तींचे संरक्षण आणि चांगल्या उपचारांसाठी दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या निवासस्थानी मध्यरात्री सुनावणी झाली होती. मुस्तफाबादमधील एका रुग्णालयातून अॅम्ब्युलन्ससाठी सुरक्षित रस्ता देण्यात यावा, तसेच जखमींना सरकारी रुग्णालयात पाठवावे, असे निर्देश कोर्टाने दिल्ली पोलिसांना दिले होते.

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसdelhi violenceदिल्ली