शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिल्लीतील हिंसाचारावरून जावडेकरांचे सोनिया गांधींना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 16:49 IST

सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्वैवी आणि निंदणीय आहे. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी इच्छाही जावडेकरांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली - दिल्लीतील हिंसेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दिल्लीतील परिस्थितीवर काँग्रेस राजकारण करत असल्याचा दावा करताना गृहमंत्री अमित शाह परिस्थीती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. 

दिल्लीत उसळलेल्या दंगलीवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केंद्र सरकार आणि अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दिल्लीतील हिंसाचार हा पूर्वनियोजित होता. दिल्लीत दंगल उसळल्यानंतर ७२ तासांपर्यंत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक कारवाई करणे टाळले. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती.

यावर जावडेकर म्हणाले की, दिल्लीतील हिंसाचारावर राजकारण करण्यात येत आहे. काँग्रेसच्या या धोरणामुळे पोलिसांचे मनोबल खचत आहे. गृहमंत्री अमित शाह सर्व पक्षांशी चर्चा करून परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे जावडेकर यांनी म्हटले आहे. हिंसेसाठी सरकारला दोष देश देणे म्हणजे गलिच्छ राजकारण असल्याचे त्यांनी नमूद केले.

सोनिया गांधींनी दिल्लीतील हिंसचारावर अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना जावडेकर म्हणाले की, गृहमंत्री पहिल्या दिवसापासून परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ते जिथं असतात तिथून काम करतात. शिख दंगलीत ज्यांचे हात काळे झालेले आहेत, तेच आज कोण कुठय असा प्रश्न विचारत असल्याचा टोला जावडेकरांनी सोनिया गांधींना लगावला आहे.  

दरम्यान सोनिया गांधी यांचे वक्तव्य दुर्वैवी आणि निंदणीय आहे. अशा परिस्थितीत सर्व पक्षांनी एकत्र येऊन शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी इच्छाही जावडेकरांनी व्यक्त केली.