शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

"गरिबांसाठी बेरोजगारी हे सर्वात मोठं संकट; कोरोना महामारीत 76% लोकांनी गमावल्या नोकऱ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:42 IST

Unemployment : दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

लोकनीती-CSDS सर्वेक्षणातील सहभागींपैकी 60% लोक कुठेना कुठेतरी नोकरी करतात असे आढळून आले. यापैकी 33% लोक कोणत्या ना कोणत्या नोकरीत गुंतलेले होते आणि 27% छोटा व्यवसाय चालवत आहेत. सुमारे 17% कोणत्याही कामात गुंतलेले नव्हते किंवा नोकरी शोधत होते. 19% महिलांनी त्या गृहिणी असल्याचं म्हटलं आहे तर 4% त्यांचे शिक्षण घेत आहेत. 41% स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या, त्यापैकी 22% नोकरदार होत्या आणि 19% महिलांनी छोटा व्यवसाय सुरू केला होता. पुरुष 77% पेक्षा जास्त नोकरदार होते ज्यापैकी 43% नोकरदार होते आणि 34% छोटा व्यवसाय चालवत होते.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे 76% लोकांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्या, तर 24% लोकांनी इतर काही काम सुरू करण्यासाठी आपली नोकरी सोडली. सर्वेक्षणात 63% लोकांनी कोरोनाच्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागले असं म्हटलं आहे. सर्वेक्षण केलेल्या 15% लोकांनी नोंदवले की, महामारीच्या काळात त्यांना त्यांच्या गावी परत जावे लागले आणि 7% लोकांना त्यांची घरे रिकामी करावी लागली. रिकामी घरांची ही कमी संख्या असू शकते कारण सर्वेक्षण सहभागी दिल्लीतील नवीन स्थलांतरित नाहीत कारण त्यापैकी 29% दिल्लीतच जन्मलेले आणि वाढलेले आहेत

57% लोकांनी सांगितले की ते 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत आहेत. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महामारी दरम्यान, 8% लोकांना आर्थिक मदत मिळाली होती आणि 4% लोकांना सरकारकडून नोकरीशी संबंधित मदत मिळाली होती. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, दिल्लीत जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे मिळाले तर ते त्यांच्या गावात राहतील का? या प्रश्नाच्या उत्तरात, 42% म्हणाले की त्यांना त्यांच्या गावात किंवा शहरात स्थायिक व्हायला आवडेल तर 55% म्हणाले की ते दिल्लीत राहतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारीjobनोकरी