शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

"गरिबांसाठी बेरोजगारी हे सर्वात मोठं संकट; कोरोना महामारीत 76% लोकांनी गमावल्या नोकऱ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:42 IST

Unemployment : दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

लोकनीती-CSDS सर्वेक्षणातील सहभागींपैकी 60% लोक कुठेना कुठेतरी नोकरी करतात असे आढळून आले. यापैकी 33% लोक कोणत्या ना कोणत्या नोकरीत गुंतलेले होते आणि 27% छोटा व्यवसाय चालवत आहेत. सुमारे 17% कोणत्याही कामात गुंतलेले नव्हते किंवा नोकरी शोधत होते. 19% महिलांनी त्या गृहिणी असल्याचं म्हटलं आहे तर 4% त्यांचे शिक्षण घेत आहेत. 41% स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या, त्यापैकी 22% नोकरदार होत्या आणि 19% महिलांनी छोटा व्यवसाय सुरू केला होता. पुरुष 77% पेक्षा जास्त नोकरदार होते ज्यापैकी 43% नोकरदार होते आणि 34% छोटा व्यवसाय चालवत होते.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे 76% लोकांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्या, तर 24% लोकांनी इतर काही काम सुरू करण्यासाठी आपली नोकरी सोडली. सर्वेक्षणात 63% लोकांनी कोरोनाच्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागले असं म्हटलं आहे. सर्वेक्षण केलेल्या 15% लोकांनी नोंदवले की, महामारीच्या काळात त्यांना त्यांच्या गावी परत जावे लागले आणि 7% लोकांना त्यांची घरे रिकामी करावी लागली. रिकामी घरांची ही कमी संख्या असू शकते कारण सर्वेक्षण सहभागी दिल्लीतील नवीन स्थलांतरित नाहीत कारण त्यापैकी 29% दिल्लीतच जन्मलेले आणि वाढलेले आहेत

57% लोकांनी सांगितले की ते 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत आहेत. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महामारी दरम्यान, 8% लोकांना आर्थिक मदत मिळाली होती आणि 4% लोकांना सरकारकडून नोकरीशी संबंधित मदत मिळाली होती. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, दिल्लीत जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे मिळाले तर ते त्यांच्या गावात राहतील का? या प्रश्नाच्या उत्तरात, 42% म्हणाले की त्यांना त्यांच्या गावात किंवा शहरात स्थायिक व्हायला आवडेल तर 55% म्हणाले की ते दिल्लीत राहतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारीjobनोकरी