शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

"गरिबांसाठी बेरोजगारी हे सर्वात मोठं संकट; कोरोना महामारीत 76% लोकांनी गमावल्या नोकऱ्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 15:42 IST

Unemployment : दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लाखो लोक बेरोजगार झाले आणि त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. दिल्लीतील झोपडपट्टी भागात लोकनीती-CSDS ने कोरोनाच्या काळात बेरोजगारीबाबत सर्वेक्षण केले, ज्यामध्ये काही धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

लोकनीती-CSDS सर्वेक्षणातील सहभागींपैकी 60% लोक कुठेना कुठेतरी नोकरी करतात असे आढळून आले. यापैकी 33% लोक कोणत्या ना कोणत्या नोकरीत गुंतलेले होते आणि 27% छोटा व्यवसाय चालवत आहेत. सुमारे 17% कोणत्याही कामात गुंतलेले नव्हते किंवा नोकरी शोधत होते. 19% महिलांनी त्या गृहिणी असल्याचं म्हटलं आहे तर 4% त्यांचे शिक्षण घेत आहेत. 41% स्त्रिया त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत होत्या, त्यापैकी 22% नोकरदार होत्या आणि 19% महिलांनी छोटा व्यवसाय सुरू केला होता. पुरुष 77% पेक्षा जास्त नोकरदार होते ज्यापैकी 43% नोकरदार होते आणि 34% छोटा व्यवसाय चालवत होते.

सर्वेक्षणात भाग घेतलेल्या सुमारे 76% लोकांनी सांगितले की, त्यांनी कोरोनाच्या काळात आपल्या नोकऱ्या गमावल्या, तर 24% लोकांनी इतर काही काम सुरू करण्यासाठी आपली नोकरी सोडली. सर्वेक्षणात 63% लोकांनी कोरोनाच्या काळात आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागले असं म्हटलं आहे. सर्वेक्षण केलेल्या 15% लोकांनी नोंदवले की, महामारीच्या काळात त्यांना त्यांच्या गावी परत जावे लागले आणि 7% लोकांना त्यांची घरे रिकामी करावी लागली. रिकामी घरांची ही कमी संख्या असू शकते कारण सर्वेक्षण सहभागी दिल्लीतील नवीन स्थलांतरित नाहीत कारण त्यापैकी 29% दिल्लीतच जन्मलेले आणि वाढलेले आहेत

57% लोकांनी सांगितले की ते 10 वर्षांहून अधिक काळ दिल्लीत राहत आहेत. सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की महामारी दरम्यान, 8% लोकांना आर्थिक मदत मिळाली होती आणि 4% लोकांना सरकारकडून नोकरीशी संबंधित मदत मिळाली होती. सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आले की, दिल्लीत जेवढे पैसे मिळतात तेवढेच पैसे मिळाले तर ते त्यांच्या गावात राहतील का? या प्रश्नाच्या उत्तरात, 42% म्हणाले की त्यांना त्यांच्या गावात किंवा शहरात स्थायिक व्हायला आवडेल तर 55% म्हणाले की ते दिल्लीत राहतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUnemploymentबेरोजगारीjobनोकरी