शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

दिल्लीत 12 दहशतवादी घुसले; देशात हाय अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2019 10:06 IST

गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांतील पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

ठळक मुद्दे गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांतील पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्लीमध्ये जवळपास बारा दहशतवादी घुसले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद 370 हटवल्यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना भारतात मोठा घातपात घडवून आणण्याची शक्यता भारतातील गुप्तचर संस्थांनी व्यक्त केली आहे. गुप्तचर संस्थांनी सर्व राज्यांतील पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. दिल्लीसह देशातील अनेक शहरांमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये जवळपास बारा दहशतवादी घुसले आहेत. 

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) असलेल्या दहशतवाद्यांनी 'जैश-ए-मोहम्मद'च्या तीन ते चार प्रशिक्षित दहशतवाद्यांच्या गटांना दिल्ली, काश्मीर आणि पंजाब येथे 'करो या मरो' या सूत्रानुसार हल्ले करण्यासाठी पाठवले आहे. दहशतवादी संवादासाठी 'दिवाळी फटाके' आणि 'काश्मिरी सफरचंदांचा दिल्लीत पुरवठा' यासारख्या सांकेतिक शब्दांचा वापर करत आहेत. पाच दिवसांपूर्वी काश्मिरमधील एका सफरचंदाच्या बागेत दिल्लीत मोठा घातपात घडविण्याची गुप्त योजना तयार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. 

जैशचा जम्मू-काश्मीरचा कमांडर अबू उस्मान यांने हा कट आखला असून या गुप्त योजनेला ‘डी’ असे नाव दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मिरातील बांदीपोरा जिल्ह्यातील सफरचंद बागेत पाच दिवसांपूर्वी जैश प्रशिक्षित दहशतवाद्यांची बैठक झाली होती. या बैठकीत एक पाकिस्तानी आणि दोन काश्मिरी दहशतवादी उपस्थित होते. अबू उस्मानकडे स्निपर रायफल होती, तर उर्वरित तीन दहशतवाद्यांकडे एके-47, पिस्तूल आणि हँड ग्रेनेड होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. गर्दीच्या ठिकाणांबरोबरच महत्त्वाच्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्याची शक्यता व्यक्त होत आहेत. 

गुप्तचर यंत्रणांना या दहशतवादी कटाबाबत पाच दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. जैश कमांडर अबू उस्मान याने बांदीपोरा भागातील मीर मोहल्ला येथील एका सफरचंदाच्या बागेत ओव्हर ग्राऊंड कामगारांची बैठक घेतली. गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, बीएसएफ आणि दिल्ली पोलिसांना दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांमध्ये काश्मिरी, अफगाणी आणि दोन पाकिस्तानी तरुणांचा समावेश आहे. या दहशतवादी टीममध्ये काही आत्मघातकी दहशतवादीही आहेत. दिल्ली, मुंबई, बंगळुरु तसेच कोलकाता यांसह अनेक शहरात हल्ले घडवण्याचा जैश-ए-मोहम्मदचा कट आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीterroristदहशतवादी