शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

दिल्लीत प्रदूषणाचा कहर, शाळांना सुट्टीजाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 05:03 IST

दिल्लीतील प्रदूषण मंगळवारी अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले असून, धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषण मंगळवारी अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले असून, धुक्याच्या गडद चादरीमुळे आज दिल्लीत हवेची गुणवत्ता आणि दृश्यमानता यात मोठी घसरण झाली आहे. हवेची गुणवत्ता चिंताजनक झाल्याने, दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी फिरणेही अवघड झाले आहे.केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाने हवेच्या गुणवत्तेला अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ प्रदूषण अतिशय गंभीर स्तरावर पोहोचले आहे. मंगळवारी सकाळी प्रदूषण बोर्डाने हवेची गुणवत्ता तपासली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यासाठी प्रदूषण नियंत्रण प्राधिकरणाकडून उपाययोजना केल्या जाऊ शकतात.यात पार्किंग शुल्क चारपट वाढविले जाऊ शकते. हीच स्थिती आगामी ४८ तास कायम राहिल्यास ग्रेडेड रिस्पॉन्स अ‍ॅक्शन प्लाननुसार (जीआरएपी) शाळा काही कालावधीसाठी बंद ठेवल्या जाणार आहेत, तसेच सम-विषम वाहन योजना पुन्हा सुरू होणार आहे. या आधी २० आॅक्टोबर रोजीही दिल्लीतील हवेची गुणवत्ता चिंताजनक होती.अशा हवेमुळे लोकांना श्वासासंबंधी त्रास होऊ शकतो. श्वास आणि हृदय व रक्तवाहिन्यांचा त्रास असलेल्या नागरिकांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे एयर लॅब प्रमुख दीपांकर साहा यांनी सांगितले की, हवा अजिबात वाहात नसून, त्यामुळे ही परिस्थिती ओढावली आहे. शेजारील पंजाब आणि हरयाणा राज्यांत या काळात शेतीमधील काडीकचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे, तसेच नोएडा व गाझियाबादमध्येही हवा अतिशय वाईट आहे.वाढते प्रदूषण पाहता, दिल्लीतील शाळा काही दिवस बंद ठेवाव्यात, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना सांगितले. सिसोदिया यांच्याकडे शिक्षण खाते आहे. त्यांचे खाते या संबंधात आदेश काढला आहे. मात्र, आजही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती अतिशय कमी होती. इंडियन मेडिकल असोसिएशननेही शाळांमध्ये खुल्या मैदानात होणारे खेळ आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटी थांबवाव्यात, असे आवाहन सरकारला केले आहे. तसे केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचे रक्षण होऊ शकेल. दिल्लीतील हाफ मॅरेथॉनही रद्द करण्याची मागणीही मेडिकल असोसिऐशनने केली आहे.जवानांना दिले ९००० मास्ककेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील जवानांना ९००० मास्कचे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. आयएसएफचे हे जवान विमानतळ, दिल्ली मेट्रो आणि अन्य सरकारी मंत्रालयात तैनात आहेत. खुल्या जागेत ड्युटी करत असलेल्या जवानांना विषारी वायूपासून बचाव करता यावा, म्हणून हे मास्क देण्यात आले आहेत. पोलिसांनाही असे मास्क दरवर्षी देण्यात येतात.