शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

"आमचं सरकार आल्यास चुकीचं पाणी बिल माफ करू", विधानसभा निवडणुकापूर्वी अरविंद केजरीवालांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:07 IST

Arvind Kejriwal : दिल्लीत विधानसभा निवडणुकापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एक घोषणा केली.

Arvind Kejriwal : नवी दिल्ली : दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आम आदमी पक्षासह (आप) सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. आज पत्रकार परिषदेत अरविंद केजरीवाल म्हणाले की, भाजपला फक्त शिवीगाळ करून ही निवडणूक जिंकायची आहे. आम्ही जिथे जात आहोत, तिथे आमच्या १० वर्षांच्या कामाच्या जोरावर मते मागत आहोत. पण भाजपवाले म्हणत आहेत की, आम्ही एवढ्या शिव्या दिल्या. ते शिव्या देऊन मतं मागत आहेत.

दिल्लीत विधानसभा निवडणुकापूर्वी अरविंद केजरीवाल यांनी एक घोषणा केली. यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, लोकांना मिळालेल्या चुकीच्या पाण्याच्या बिलांची चिंता करण्याची गरज नाही. दिल्लीत आपचे सरकार स्थापन झाल्यानंतर जी चुकीची बिले आली आहेत, ती माफ करू. दिल्लीतील ज्यांची पाण्याची बिले चुकीची आहेत, त्यांनी पाण्याची बिले भरू नयेत. २०२५ मध्ये आमचे सरकार आल्यावर आम्ही चुकीचे पाणी बिल माफ करू, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.

काँग्रेसबाबत अरविंद केजरीवाल म्हणाले की, काँग्रेसने जनतेपर्यंत पोहोचणे बंद केले आहे. काँग्रेस आणि भाजपने एकत्र निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. दरम्यान, पंजाबमधील काही महिला आज दिल्लीत आल्या आहेत आणि अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर निदर्शने करत आहेत. पंजाबमधील आप सरकारने राज्यातील महिलांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. आपने पंजाबमध्ये दिलेले आपले आश्वासन मोडले आहे, असे महिलांचे म्हणणे आहे. 

शुक्रवारी (दि.३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक प्रकल्पांची पायाभरणी केली आणि आपच्या नेतृत्वाखालील दिल्ली सरकारवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी आपला आपत्ती संबोधत म्हटले की, गेल्या १० वर्षांत दिल्ली सरकारने दिल्लीला भयंकर संकटात ढकलले आहे. तसेच, यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी लोकांना आश्वासन दिले की, येत्या काही वर्षांत दिल्लीतील हजारो लोकांना घरांचे पुन्हा वाटप केले जाईल.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhi electionदिल्ली निवडणूक