शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
4
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
5
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
6
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
7
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
8
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
9
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
10
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
11
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
12
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
13
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
14
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
15
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
16
डिजिटल अरेस्टच्या गुन्ह्यात देशात पहिल्यांदाच शिक्षा; पश्चिम बंगालमध्ये ९ जणांना जन्मठेप, उत्तर प्रदेशात ७ वर्षांची शिक्षा
17
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
18
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
19
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
20
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू

दिल्ली - मुंबई टॅल्गो ट्रेनची उद्या अंतिम चाचणी

By admin | Updated: September 9, 2016 13:54 IST

भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची शनिवारी अंतिम चाचणी होणार आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून 150 किमी ताशी वेगानं ट्रेन धावणार आहे.

- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - भारतातील सर्वात वेगवान समजल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची शनिवारी अंतिम चाचणी होणार आहे. दिल्ली ते मुंबई ही चाचणी घेण्यात येणार असून 150 किमी ताशी वेगानं ट्रेन धावणार आहे. पहाटे 2.45 वाजता ही ट्रेन दिल्लीवरुन निघणार असून मुंबईत दुपारी 2.29 वाजता पोहोचणं अपेक्षित आहे. टॅल्गो ट्रेनमुळे मुंबई - दिल्ली प्रवास फक्त 12 तासांमध्ये करणं शक्य होणार आहे. 
 
2 ऑगस्ट रोजी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी झाली होती. दिल्ली ते मुंबई दरम्यान ही चाचणी पार पडली होती. दिल्लीहून रात्री 8 वाजता ही ट्रेन रवाना झाली होती. ट्रेन सकाळपर्यंत मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचणं अपेक्षित होतं. मात्र गुजरातमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे टॅल्गो ट्रेन मुंबईत 2 तास उशिरानं दाखल झाली होती. या चाचणीत टॅल्गो ट्रेन ताशी 130 वेगानं चालवली गेली. 
 
साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे. सध्या सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी 16 तास लागतात.