शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वकील-पोलीस मारहाण प्रकरण : दिल्ली हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2019 18:37 IST

पार्किंगच्या मुद्द्यावरून तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये झालेली मारहाण, जाळपोळ, गोळीबार या घटनांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली.

नवी दिल्ली : पार्किंगच्या मुद्द्यावरून तीस हजारी न्यायालयाच्या परिसरात शनिवारी वकील आणि पोलिसांमध्ये झालेली मारहाण, जाळपोळ, गोळीबार या घटनांची गंभीर दखल दिल्ली उच्च न्यायालयाने घेतली. याप्रकरणी रविवारी तातडीची सुनावणी घेत केंद्र सरकार, पोलीस आयुक्त आणि राज्याचे मुख्य सचिव यांना नोटीस बजावली. या घटनेची चौकशी गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष पथकामार्फत केली जाणार असून निवृत्त न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन चौकशीचेही आदेश देण्यात आले. हिंसाचारात सहभागी असल्याच्या आरोपावरून एका पोलीस उप निरीक्षकाला निलंबित करण्याचे तर एका पोलिसाच्या बदलीचे निर्देश न्यायालयाने दिले.दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल यांनी याप्रकरणी माध्यमांतील बातम्या, पोलीस अधिका-यांची साक्ष-यांच्या आधारे स्वत:हून याचिका दाखल करून घेतली. न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायाधीश सी. हरि शंकर यांच्या खंडपीठासमोर राहुल मेहरा यांनी दिल्ली पोलिसांची बाजू मांडली. मारहाणीत २१ पोलीस आणि ८ वकील जखमी झाल्याचे मेहरा यांनी सांगितले. या प्रकरणी चार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली. वकिलांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चौकशीच्या काळात विशेष पोलीस आयुक्त संजय सिंग आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त हरिंदर सिंग यांची बदली करण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले.शनिवारी दुपारी तीस हजारी न्यायालयाच्या आवारात वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात सुमारे २० पोलीस आणि १० वकील जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीपेक्षा अधिक सहकारी या हिंसाचारात जखमी झाल्याचा दावा वकिलांनी केला आहे. पोलिसांनी गोळीबार केल्याचा दावा वकिलांनी केला आहे. मात्र, पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याचे म्हटले आहे. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि दिल्ली सरकारचे मुख्य सचिवही उपस्थित होते. बैठकीनंतर न्यायालयाने याप्रकरणी दुपारी एक वाजता सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला. बार काऊंसिल ऑफ इंडियाने नायब राज्यपाल अनिल बैजल यांना पत्र पाठवून या प्रकरणी दोषी पोलिसांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, घटनेनंतर न्यायाधीशांनी रुग्णालयात जाऊन जखमी वकिलांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.         जखमी वकिलांना मदत जाहीरपोलिसांसोबत मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या दोन वकिलांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत दिल्ली बार काऊंसिलने जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जखमी वकिलांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. काऊंसिलचे अध्यक्ष के.सी. मित्तल यांनी या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

अमित शहा यांनी माफी मागावी - काँग्रेसवकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या मारहाणप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वकिलांची माफी मागावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी या घटनेला जबाबदार पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ही घटना म्हणजे भाजपची क्रूरता, अहंकार आणि कायद्याला सन्मान ने देण्याच्या कृतीचाच हा परिणाम असल्याचे सुरजेवाला म्हणाले.