शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Video - धक्कादायक! बाजारात अचानक घुसला पाण्याचा टँकर; लोकांना चिरडलं, 5 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 09:22 IST

एका बाजारात अत्यंत वेगाने एक पाण्याचा ट्रँकर घुसला आणि त्याने लोकांना चिरडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - दिल्लीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दिल्लीच्या बदरपूर परिसरातील एका बाजारात अत्यंत वेगाने एक पाण्याचा ट्रँकर घुसला आणि त्याने लोकांना चिरडलं. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बदरपूर (Badarpur) भागातील खान सब्जी मंडी (Khan Sabzi Mandi) येथे दिल्ली (Delhi) जल बोर्डाचा टँकर (Water Board Tanker) गर्दीत घुसला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींना तातडीने अपोलो आणि एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील तीन जणांना थोडीच दुखापत झाली आहे. तर दोघांना फ्रॅक्चर झालं असून एकाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचं म्हटलं आहे. टँकर जप्त करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसंच टँकर मालकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, बाजारात लोक खरेदीसाठी फिरत आहेत. याच दरम्यान, दिल्ली जल बोर्डाचा पाण्याचा टँकर अनियंत्रित झाला आणि थेट गर्दीत घुसला. लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, टँकरचा वेग खूप जास्त असल्याने काही लोक चिरडले गेल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :delhiदिल्ली