शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दिल्ली विधानसभा : 'शाहीन बागे'तही भाजपचा दारुण पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 15:19 IST

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत. 

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीला स्पष्ट कौल दिला आहे. 'आप'ने 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप 7 मतदारसंघांत पुढे आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार हे निश्चित झालं आहे. तर दिल्ली विधानसभेत सर्वात वादग्रस्त मुद्दा ठरलेल्या शाहीन बाग आंदोलनाचा भाजपला फटका बसला आहे. मात्र 'आप'ला फायदा झाला आहे. 

भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचाराच शाहीन बाग येथील नागरिकता संशोधन कायदा आणि एनआरसी विरोधातील आंदोलन महत्त्वपूर्ण मुद्दा बनवला होता. या मुद्दावर भाजपने मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला होता. शाहीन बाग आंदोलनाचा भाग हा ओखला मतदार संघात येत होता. त्यातच शाहीन बाग आंदोलनाकडे देशाचे लक्ष लागलेले होते. त्यामुळे सहाजिकच ओखला मतदार संघातील निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. या मतदार संघातून भाजपला 25 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला. 

ओखला मतदार संघातून आपचे अमानतुल्ला खान यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे ब्रह्म सिंह यांना पराभूत केले आहे. अमानतुल्ला यांना ब्रह्म सिंह यांच्यापेक्षा 25, 501 अधिक मते मिळाली आहेत. 

2015 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता.  त्यावेळी भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या होत्या. या निवडणुकीत आपला काही जागांचे नुकसान झाले आहे. तर भाजपचा आकडा 3 हून 9 पोहोचला आहे.