शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

यमुनेत विष मिसळल्याचे वक्तव्य अरविंद केजरीवालांना भोवणार? निवडणूक आयोगाने विचारले ५ प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 13:52 IST

Delhi Election 2025 : यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. 

Delhi Election Yamuna Politics : दिल्ली विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याशिवाय, दिल्ली निवडणुकीत यमुना वाद अधिकच तापला आहे. यमुना नदीच्या पाण्यात हरयाणा सरकारने विष मिसळल्याचा गंभीर आरोप आपचे नेते अरविंद केजरीवाल आरोप केला होता. हा आरोप आता त्यांना भोवण्याची शक्यता आहे. 

या संदर्भात निवडणूक आयोगाने आता अरविंद केजरीवाल यांना पाच प्रश्न विचारले आहेत आणि उद्या म्हणजे गुरुवारपर्यंत त्यांची उत्तरे मागितली आहेत. १) हरयाणा सरकारने कोणत्या प्रकारचे विष मिसळले आहे? २) या विषाचे प्रमाण, स्वरूप आणि ओळखण्याच्या पद्धतीबद्दल तुमच्याकडे कोणते पुरावे आहेत? ३) हे विष कोणत्या ठिकाणी सापडले? ४) दिल्ली जल बोर्डाच्या कोणत्या अभियंत्यांनी हे विष ओळखले? ५) अभियंत्यांनी दिल्लीत येणारे विषारी पाणी कसे रोखले, कोणत्या तंत्रज्ञानाने? असे प्रश्न निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांना विचारले आहेत.

आता अरविंद केजरीवाल यांना उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत या पाच प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. जर त्यांनी उत्तर दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी  प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी म्हटले होते की, हरयाणाचे पाणी यमुनेतून दिल्लीला येते. भाजपच्या हरयाणा सरकारने यमुनेचे पाणी विषारी बनवले आहे. मात्र, दिल्ली जल बोर्डाने ते पाणी दिल्लीत येण्यापासून रोखले. भाजप सरकारने पाण्यात असे विष मिसळले आहे, जे जलशुद्धीकरण केंद्रांनीही स्वच्छ करता येत नाही. यामुळे दिल्लीच्या एक तृतीयांश भागात पाण्याची कमतरता आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या गंभीर आरोप केल्यानंतर हरयाणा सरकार देखील आक्रमक झाले आहे. हरयाणा सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापनाने अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध सोनीपत कोर्टात खटला दाखल केला आहे. कोर्टाने राज्य सरकारची याचिका स्वीकारली आहे. तसेच, कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना नोटिस पाठवली असून याप्रकरणी १७ फेब्रुवारीला त्यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग