शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

'केंद्र सरकारने जमीन द्यावी, आम्ही त्यावर घरे बांधू', अरविंद केजरीवालांचे PM मोदींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 14:14 IST

Delhi Election 2025 : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानीतील राजकारण तापले आहे.

Delhi Election 2025 : चौथ्यांदा दिल्लीची सत्ता मिळवण्यासाठी मैदानात उतरलेले आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवालांनी घोषणांचा सपाटा लावला आहे. आता त्यांनी रविवारी(19 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने अनुदानावर जमीन उपलब्ध करून दिल्यास दिल्ली सरकार त्यावर घरे बांधेल आणि सुलभ हप्त्यांमध्ये सफाई कामगारांना मालकी हक्क देईल, अशी घोषणा केजरीवालांनी केली आहे.

केजरीवालांचे पीएम मोदींना पत्रदिल्लीतील जमिनीचा प्रश्न केंद्राच्या अखत्यारीत आहे, म्हणून अरविंद केजरीवालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून यासंदर्भात विनंती केली आहे. केजरीवाल आपल्या पत्रात म्हणाले की, 'पंतप्रधान मोदीजी, मी एनडीएमसी आणि एमसीडी भागात काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाकडे तुमचे लक्ष वेधण्यासाठी हे पत्र लिहितोय. हे कर्मचारी आपल्या शहराच्या स्वच्छता व्यवस्थेचा कणा आहेत.'

'त्यांच्या सेवेदरम्यान ते सरकारी घरांमध्ये राहतात, परंतु सेवानिवृत्तीनंतर त्यांना ही घरे रिकामी करावी लागतात. ते स्वतःचे घर विकत घेऊ शकत नाहीत किंवा दिल्लीत महागडे भाड्याचे निवासस्थान घेऊ शकत नाहीत. दिल्लीतील जमिनीशी संबंधित बाबी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने आपणास विनंती आहे की. स्वच्छता कामगारांना सवलतीच्या दरात जमीन उपलब्ध करून द्यावी. या जमिनींवर दिल्ली सरकार त्यांच्यासाठी घरे बांधेल अन् कर्मचारी या घरांची किंमत सरकारला सुलभ हप्त्यांमध्ये परत करतील.'

केजरीवाल पुढे म्हणतात, 'ही सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची, विशेषत: खालच्या वर्गातील कर्मचाऱ्यांची समस्या आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की ही योजना स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून सुरू करून सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू करावी. मला विश्वास आहे की, तुम्ही हा प्रस्ताव मान्य कराल आणि लवकरच कृती आराखडा बनवून त्यावर काम कराल.' 

भाजपवर निशाणा साधत अरविंद केजरीवाल म्हणाले की, आज आपण ज्या प्रकारचा प्रचार पाहत आहोत, अशा प्रकारचा प्रचार दिल्लीतील जनतेने याआधी पाहिला नाही. दिल्लीतील जनतेने आजपर्यंत असा हिंसाचार पाहिला नाही, ज्यामध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. नवी दिल्लीच्या जागेवर केजरीवाल यांना २० हजार मतांनी पराभूत केल्याच्या भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या दाव्यावर आप सुप्रिमो म्हणाले - 'त्यांना काही दिवस स्वप्नात जगू द्या, त्यात काही नुकसान नाही. मला ते लेखी द्या.    

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदीAAPआपdelhiदिल्ली