शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Delhi Election 2025: अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 08:23 IST

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या.

नवी दिल्ली: यमुनेच्या पाण्यात हरयाणातील भाजप सरकार विषारी द्रव्य मिसळत असल्याचा गंभीर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल शुक्रवारी यावर खुलासा करण्यासाठी निवडणूक आयोगासमोर हजर झाले. आपली ही टिप्पणी यमुनेच्या पाण्यात अमोनियाच्या प्रचंड वाढलेल्या पातळीसंबंधी होती, असे केजरीवाल यांनी या खुलाशात नमूद केले आहे. आपल्या वक्तव्याबाबत काय शिक्षा द्यायची हे आयोगाने आधीच निश्चित केले असल्याचे नोटिसीतील भाषेवरून वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या. केजरीवाल यांनी हे आरोप केल्यानंतर भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी म्हणणे मांडले. 

राजधानीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना यमुना नदीच्या विषारी पाण्यावरून हरयाणातील भाजप सरकारवर केजरीवाल यांनी केलेला आरोप अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. केजरीवाल यांनी आपल्या सहा पानी उत्तरात हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रचार काळात हरयाणा मुद्दाम यमुनेच्या पाण्यावरून राजकारण करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावेळी 'आप' नेत्यांसोबत यमुनेच्या पाण्याच्या तीन बाटल्याही घेऊन गेले होते.

काय म्हणाले होते केजरीवाल?

केजरीवाल हे २७ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत म्हणाले होते, 'हरयाणातील भाजप सरकारने यमुनेच्या माध्यमातून दिल्लीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळले आहे. दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्यांचे आभार अशासाठी की, त्यांनी वेळीच हे रोखले आणि पाणीपुरवठा थांबवला. अन्यथा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला असता.'

'हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार'

१५ जानेवारीला धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे • सांगितले होते. याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा यमुनेच्या पाण्यातील अमोनियाचे ३.२ पीपीएम (पार्टस पर मिलियन) प्रमाण २६-२७ जानेवारीपर्यंत ७ पीपीएमवर गेले होते.

याबाबत मुख्यमंत्री आतिशी व मान यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी जादा पाणी सोडण्याचे आश्वासन फक्त दिले आणि मुद्दाम दूषित पाणी दिल्लीसाठी सोडले.

या घटनाक्रमावरून असे दिसून येते की, याला हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

आता खुलासा असा केला...

मी यमुनेच्या प्रक्रिया होण्यापूर्वीच्या पाण्याबद्दल बोललो होतो. या पाण्यात अमोनियाची धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे सांगितले होते. त्याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग