शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election 2025: अरविंद केजरीवाल निवडणूक आयोगासमोर हजर, आरोपाबद्दल काय केला खुलासा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 08:23 IST

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या.

नवी दिल्ली: यमुनेच्या पाण्यात हरयाणातील भाजप सरकार विषारी द्रव्य मिसळत असल्याचा गंभीर आरोप करणारे आम आदमी पक्षाचे (आप) नेते अरविंद केजरीवाल शुक्रवारी यावर खुलासा करण्यासाठी निवडणूक आयोगासमोर हजर झाले. आपली ही टिप्पणी यमुनेच्या पाण्यात अमोनियाच्या प्रचंड वाढलेल्या पातळीसंबंधी होती, असे केजरीवाल यांनी या खुलाशात नमूद केले आहे. आपल्या वक्तव्याबाबत काय शिक्षा द्यायची हे आयोगाने आधीच निश्चित केले असल्याचे नोटिसीतील भाषेवरून वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.

आपले म्हणणे आयोगासमोर मांडण्यासाठी गेलेल्या केजरीवाल यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी होत्या. केजरीवाल यांनी हे आरोप केल्यानंतर भाजपच्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी म्हणणे मांडले. 

राजधानीत विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना यमुना नदीच्या विषारी पाण्यावरून हरयाणातील भाजप सरकारवर केजरीवाल यांनी केलेला आरोप अत्यंत वादग्रस्त ठरला आहे. केजरीवाल यांनी आपल्या सहा पानी उत्तरात हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. प्रचार काळात हरयाणा मुद्दाम यमुनेच्या पाण्यावरून राजकारण करत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे. यावेळी 'आप' नेत्यांसोबत यमुनेच्या पाण्याच्या तीन बाटल्याही घेऊन गेले होते.

काय म्हणाले होते केजरीवाल?

केजरीवाल हे २७ जानेवारी रोजी पत्रकार परिषदेत म्हणाले होते, 'हरयाणातील भाजप सरकारने यमुनेच्या माध्यमातून दिल्लीत पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्यात विष मिसळले आहे. दिल्ली जल बोर्डाच्या अभियंत्यांचे आभार अशासाठी की, त्यांनी वेळीच हे रोखले आणि पाणीपुरवठा थांबवला. अन्यथा मोठ्या प्रमाणात नरसंहार झाला असता.'

'हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार'

१५ जानेवारीला धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे • सांगितले होते. याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा यमुनेच्या पाण्यातील अमोनियाचे ३.२ पीपीएम (पार्टस पर मिलियन) प्रमाण २६-२७ जानेवारीपर्यंत ७ पीपीएमवर गेले होते.

याबाबत मुख्यमंत्री आतिशी व मान यांनी हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांसमोर हा मुद्दा उपस्थित केला होता. अमोनियाचे प्रमाण कमी करण्यासाठी जादा पाणी सोडण्याचे आश्वासन फक्त दिले आणि मुद्दाम दूषित पाणी दिल्लीसाठी सोडले.

या घटनाक्रमावरून असे दिसून येते की, याला हरयाणाचे मुख्यमंत्रीच जबाबदार आहेत, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

आता खुलासा असा केला...

मी यमुनेच्या प्रक्रिया होण्यापूर्वीच्या पाण्याबद्दल बोललो होतो. या पाण्यात अमोनियाची धोकादायक पातळी कशी वाढली आहे हे सांगितले होते. त्याचा कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे, असा खुलासा केजरीवाल यांनी केला आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग