शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

मनीष सिसोदिया म्हणाले, "अरविंद केजरीवाल नरेंद्र मोदींचे पर्याय; भाजपला असुरक्षित वाटतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 20:11 IST

PM Narendra Modi : संपूर्ण देशात कोणीही पंतप्रधान मोदी किंवा त्याच्या भाजप मॉडेलची चर्चा करत नाहीत. हे केजरीवाल मॉडेलनं घाबरत आहेत, सिसोदिया यांचा निशाणा

ठळक मुद्देविधेयक पारित होणं हा लोकशाहीसाठी काळा दिवस, आपची टीकादोन्ही सभागृहात विधेयक पारित

दिल्लीमधील लोकनियुक्त सरकार आणि नायब राज्यपाल यांचं अधिकार क्षेत्र निश्चित करणारं विधेयक राज्यसभेत मंजूर झालं. विधेयक राज्यसभेच्या पटलावर येताच विरोधकांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे कामकाज दोनदा स्थगित करण्यात आलं. हुकूमशाही बंद करा, अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडलं. याच गोंधळात राष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा) विधेयक म्हणजेच Government of National Capital Territory of Delhi (Amendment) Bill 2021 (GNCTD Bill) राज्यसभेत बुधवारी मंजूर झालं. दरम्यान, या विधेयकाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी यापूर्वीही विरोध केला होता. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीदेखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. हे विधेयक पारित झाल्यावरून हे लक्षात येतं की भाजप सरकारला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापासून स्वत:ला असुरक्षित वाटत आहे, असं सिसोदिया म्हणाले. तसंच यावेळी त्यांनी केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांचे पर्याय असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. "दिल्लीबाबत केंद्र सरकारनं जे विधेयक बुधवारी पारित केलं त्यावरून मोदी सरकारच्या मनात अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या कामामुळे कसं असुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालंय हे दाखवून देत आहे. आज देशातील लोकं अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांचा पर्याय असू शकतात अशा चर्चा करू लागले आहेत," असंही ते म्हणाले. काम रोखण्यासाठी विधेयक आणलं"अरविंद केजरीवाल करत असलेल्या कामांना पुढे नेण्यापासून रोखण्यासाठी हे विधेयक आणण्यात आलं आहे. संपूर्ण देशात कोणीही पंतप्रधान मोदी किंवा त्याच्या भाजप मॉडेलची चर्चा करत नाहीत. हे केजरीवाल मॉडेलनं घाबरत आहेत. चांगल्या कामांना रोखण्यासाठी आता नरेंद्र मोदी हे नकारात्मक राजकारण खेळत आहेत," असा आरोप सिसोदिया यांनी यावेळी केला.दोन्ही सभागृहात विधेयक पारितराष्ट्रीय राजधानी राज्यक्षेत्र शासन (सुधारणा) विधेयक सोमवारी लोकसभेत संमत झालं. आता हे विधेयक राज्यसभेत पारित झाल्यानं ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे स्वाक्षरीसाठी जाईल. मागील दारातून दिल्लीतलं सरकार चालवण्याच्या हेतूनंच हे विधेयक मोदी सरकारनं आणल्याचा आरोप विरोधकांनी केला. लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आल्याचा थेट आरोप दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षानं केला होता. काँग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध करत राज्यसभेतून सभात्याग केला. त्याच गदारोळात सरकारनं विधेयक पारित करून घेतलं.लोकशाहीसाठी काळा दिवस, आपची टीकाहा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याची घणाघाती टीका आपकडून करण्यात आली. मुख्यमंत्री आणि आपचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हा दिवस लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं म्हणत मोदी सरकारचा निषेध केला.   

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीdelhiदिल्लीParliamentसंसदlok sabhaलोकसभाRajya Sabhaराज्यसभा