शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Dengue: कोरोनानंतर आता डेंग्यूचा संसर्ग, 1537 जणांना लागण तर 6 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 15:07 IST

केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून राजधानी दिल्लीतडेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढल्याने चिंता आणखीनच वाढली आहे. गेल्या आठवड्यात डेंग्यूमुळे 5 मृत्यूची नोंद झाली आहे, त्यामुळे आता दिल्लीतील मृतांची संख्या एक वरून 6 झाली आहे. गेल्या आठवडाभरात डेंग्यूच्या नव्या रुग्णांची संख्याही 531 झाली. त्यानंतर आता एकूण रुग्णसंख्या 1537 वर गेली आहे. डेंग्यू आणि मलेरियासह चिकुनगुनियाच्या रुग्णांमध्येही वाढ होताना दिसत आहे.

दिल्लीत सध्या मलेरियाचे 160 आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 73 वरुन 81 पर्यंत वाढ झाली आहे. म्हणजेच चिकुनगुनियाचे आठ नवीन रुग्ण समोर आले आहेत. डेंग्यू, मलेरिया आणि चिकुनगुनियाच्या झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णांमुळे आता परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. दिल्ली महानगरपालिकेने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 1,537 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या आठवडाभरात एकूण आकडेवारीत रुग्णांची भरती अतिशय वेगाने झाली. म्हणजेच गेल्या आठवड्यात तीन महापालिकांव्यतिरिक्त नवी दिल्ली नगर परिषद, दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या हद्दीत डेंग्यूचे 531 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याचबरोबर डेंग्यूमुळे 5 जणांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे.

तज्ज्ञांचे पथक बाधित राज्यांमध्ये जाणारराजधानी दिल्लीत डेंग्यूमुळे बिघडलेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयांने बाधित राज्यांना मदत करण्यासाठी तज्ञांची टीम पाठवण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. सोमवारी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी राजधानीतील डेंग्यूच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आढावा घेतला. यादरम्यान केंद्र आणि राज्य सरकारमधील समन्वयावर भर देण्यात आला आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतला की, डेंग्यूने बाधित राज्यांची ओळख आणि केसलोड माहिती गोळा केली जाईल. यासोबतच या राज्यांमधील परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तज्ज्ञांची टीम पाठवण्याची योजनाही केंद्र सरकारने आखली आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्रितपणे एका योजनेवर काम करण्यास सांगितले आहे. आरोग्यमंत्री मांडविया यांनी चाचणीचा वेग वाढवण्यास सांगितले आहे.

डेंग्यू तापग्रस्तांना मिळणार कोविड रुग्णांचे बेड

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्ली सरकारने एक आदेश जारी केला आहे, ज्यामध्ये कोविड-19 रुग्णांसाठी राखीव खाटांपैकी एक तृतीयांश डेंग्यू रुग्णांना देण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कोरोना विषाणूची घटती प्रकरणे आणि डेंग्यूच्या वाढत्या रुग्णांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

टॅग्स :dengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्ली