शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
4
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
5
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
6
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
7
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
8
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
9
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
10
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
11
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
12
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
13
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
14
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
15
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
16
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
17
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
18
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
19
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
20
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त

दिल्ली मृत्युकांड: ते बुवाबाजी मानत नव्हते, कोणीतरी त्यांचे खून केलेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:10 IST

उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेल्या एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींच्या मृतदेहांपैकी सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ सोमवारी पूर्ण झाले व त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला.

नवी दिल्ली : उत्तर दिल्लीच्या बुरारी भागात रविवारी सकाळी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळलेल्या एकाच कुटुंबातील ११ व्यक्तींच्या मृतदेहांपैकी सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ सोमवारी पूर्ण झाले व त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला. तरी घरात सापडलेल्या दोन वह्यांमधील गूढ लिखाणाने संपूर्ण कुटुंबाने अघोरी विद्येच्या आहारी जात आत्मघात करून घेतला असावा, अशी शंका सगळ््यांनी व्यक्त केली. मात्र या कुटुंबातून लग्न होऊन गेलेल्या कन्या सुजाता यांनी मात्र ही शक्यता ठामपणे फेटाळली आहे.११ पैकी घरातील नारायण देवी भाटिया या ७७ वर्षीय वृद्धेचा मृतदेह इतरांप्रमाणे लटकताना नव्हे, तर बिछान्यावर मिळाल्याने तो कदाचित खुनाचा प्रकार असावा, असे पोलिसांना वाटते. खास डॉक्टरांच्या पथकाने सहा मृतदेहांचे ‘पोस्टमार्टेम’ केल्यावर खुनाची शक्यता सकृतद्दर्शनी मागे पडली. मृतदेहांवर झटापटीच्या खुणा आढळल्या नाहीत. घिरात इतस्तत: विखुरलेली आठ लाकडी स्टुले सापडणेही आत्महत्येचे निदर्शक मानले जात आहे.हे कुटुंब अत्यंत धार्मिक व परोपकारी वृत्तीचे होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर २२ अंधांना दृष्टी मिळावी, यासाठी त्या सर्वांचे नेत्रदानाचे फॉर्म भरून दिल्याचे जवळच्या नातेवाइकाने सांगितले.अगदी लिहिले तसेचसापडलेल्या वह्यांमधील लिखाण जे घडले ते त्या बरहुकूम घडले, म्हणून बुचकळ्यात टाकणारे आहे. वहीत लिहिले होते,‘पट्टीया अच्छेसे बांधनी है.. शून्य के अलावा कुछ नही दिखना चाहिये... रस्सी के साथ सूती चुन्नीया या साडी का परयोग करना है... सात दिन लगातार बडपूजा करनी है... बेब्बे (नारायणी देवी) खडी नही हो सकती तो अलग कमरे मे लेट सकती है..’ ही साम्यस्थळे संशय वाढविणारी आहेत.

टॅग्स :delhiदिल्लीMurderखून