शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दहा आठवडे, दहा वाजता फक्त दहा मिनिटे; अरविंद केजरीवालांनी दिलं नरेंद्र मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 15:54 IST

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात जनजागरण अभियान आणि संपर्क अभियान सुरू करणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियानाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे दिल्ली सरकार 1 सप्टेंबरपासून नवीन अभियानाची सुरूवात करणार आहे. यामध्ये दिल्लीतील लोकांना दर रविवारी दहा वाजता दहा मिनिटे वेळ काढून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. ज्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार रोखण्यास मदत होईल असा दावा केला आहे. 

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाचं नाव दहा आठवडे, दहा वाजता, दहा मिनिटे असं ठेवण्यात आलं आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान डेंग्यू-चिकनगुनिया सारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. यंदाच्या वर्षी दिल्लीत डेंग्यूचे 75 प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, 2017 मध्ये सर्वात जास्त मृत्यू डेंग्यूमुळे झाले आहेत. मात्र त्यानंतर हा आकडा कमी कमी होत आला. आता या अभियानाच्या माध्यमातून आजारातून होणारे मृत्यू कायमचेच बंद करण्याचे प्रयत्न होणार आहेत असं ते म्हणाले. 

आरोग्य सेवेत सुधारणा2014 मध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 15,867 होती, त्यात घट होऊन ही संख्या 2018 मध्ये 2798 इतकी झाली. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झालेली घट हे आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. आमचं सरकार आल्यापासून एका वर्षात आरोग्य विभागात सुधारणा केल्या गेल्या. त्यामुळे बजेटमध्ये 14 टक्के वाढ झाली. 

मंगळवारी केजरीवाल सरकारने नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे. नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली