शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

दहा आठवडे, दहा वाजता फक्त दहा मिनिटे; अरविंद केजरीवालांनी दिलं नरेंद्र मोदींना आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2019 15:54 IST

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारतीय जनता पार्टी संपूर्ण देशात जनजागरण अभियान आणि संपर्क अभियान सुरू करणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच प्लास्टिक बंदी आणि स्वच्छता अभियानाची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे दिल्ली सरकार 1 सप्टेंबरपासून नवीन अभियानाची सुरूवात करणार आहे. यामध्ये दिल्लीतील लोकांना दर रविवारी दहा वाजता दहा मिनिटे वेळ काढून आपल्या घराची स्वच्छता करायची आहे. ज्यामुळे डेंग्यू आणि चिकनगुनियासारखे आजार रोखण्यास मदत होईल असा दावा केला आहे. 

दिल्ली सरकारकडून हे अभियान 15 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानाचं नाव दहा आठवडे, दहा वाजता, दहा मिनिटे असं ठेवण्यात आलं आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान डेंग्यू-चिकनगुनिया सारखे आजार बळावण्याची शक्यता जास्त असते. यंदाच्या वर्षी दिल्लीत डेंग्यूचे 75 प्रकरणे समोर आली आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, 2017 मध्ये सर्वात जास्त मृत्यू डेंग्यूमुळे झाले आहेत. मात्र त्यानंतर हा आकडा कमी कमी होत आला. आता या अभियानाच्या माध्यमातून आजारातून होणारे मृत्यू कायमचेच बंद करण्याचे प्रयत्न होणार आहेत असं ते म्हणाले. 

आरोग्य सेवेत सुधारणा2014 मध्ये डेंग्यू रुग्णांची संख्या 15,867 होती, त्यात घट होऊन ही संख्या 2018 मध्ये 2798 इतकी झाली. डेंग्यू रुग्णांच्या संख्येत झालेली घट हे आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे. आमचं सरकार आल्यापासून एका वर्षात आरोग्य विभागात सुधारणा केल्या गेल्या. त्यामुळे बजेटमध्ये 14 टक्के वाढ झाली. 

मंगळवारी केजरीवाल सरकारने नागरिकांकडे असलेल्या पाणी बीलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा केली. ज्या नागरिकांच्या घरी फंक्शनल मीटर आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. तसेच, उर्वरीत नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत फंक्शनल मीटर बसवून घेण्याची सवलतही दिल्ली सरकारने दिली आहे. नवीन तंत्रज्ञामुळे जुन्या बिलांसंदर्भातील अनेक अडचणी समोर आल्या आहेत. विना रिडींगही नागरिकांना बील आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतल्याचे केजरीवाल यांनी म्हटलं होतं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्ली