शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा पुन्हा महिलेच्या हाती; AAP च्या बैठकीत नाव ठरलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2024 11:58 IST

दिल्लीच्या राजकीय उलथापालथीत नव्या मुख्यमंत्रिपदाची निवड करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांच्यानंतर ही कमान एका महिलेच्या हाती देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीची पुन्हा एकदा कमान महिलेच्या हाती गेली आहे. आम आदमी पक्षाच्या बैठकीत नव्या मुख्यमंत्रिपदासाठी अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज आपच्या आमदारांची बैठक पार पडली त्यात अतिशी मार्लेना यांची सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सोडल्यानंतर दिल्लीत नवीन मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरू होती. त्यात अतिशी यांचं नाव पुढे आले आहे. 

नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी अरविंद केजरीवाल यांच्या घरी सर्व आमदारांची बैठक झाली. आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजीनामा देतील त्यानंतर अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील.  संध्याकाळी ४.३० वाजता केजरीवाल उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल. आमदारांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला त्यावर सर्वांनी एकमताने मंजुरी दिली. 

सुनीता केजरीवाल यांच्या नावाची होती चर्चा

अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल मुख्यमंत्री बनतील अशी चर्चा होती. मात्र केजरीवालांची राजकीय कारकिर्द पाहता ते सुनीता केजरीवालांना मुख्यमंत्री बनवणार नाहीत. ते त्यांच्या मंत्रिमंडळातील अनुभवी अथवा इतर सहकाऱ्याला मुख्यमंत्री बनवू शकतात असं आप पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं होते. 

अतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. अतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. २०२० साली अतिशी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर २०२३ साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. 

अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार होता. केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात कैलाश गहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.  

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप