शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2024 13:45 IST

Arvind Kejriwal News: आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. त्यावर पंतप्रधान बोलत नाहीत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Arvind Kejriwal News: दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला. यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली असून, भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारवर सडकून घणाघात करताना दिसत आहेत. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास पहिल्या शंभर दिवसांत इलेक्टोल बॉण्डमधून देण्यात आलेल्या देणगीचा तपास केला जाईल, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

दिल्लीत मोठ्या प्रमाणावर प्रचार करत आहे आणि पंजाब, कुरुक्षेत्र, भिवंडी, मुंबई, लखनऊ आणि जमशेदपूर येथेही जाऊन आलो. खूप लोकांशी बोललो आहे. महागाई आणि बेरोजगारीमुळे प्रचंड त्रास आणि संताप जनतेत आहे. पंतप्रधान त्यावर बोलत नाहीत. मुंबईत ते म्हणाले की, शरद पवार भटकती आत्मा आहेत, उद्धव ठाकरे हे त्यांच्या वडिलांचे खोटे अपत्य आहेत. इंडिया आघाडी तुमचे मंगळसूत्र हिसकावून घेईल. लोकांना त्यांच्या समस्या सोडवायला हव्या आहेत पण खऱ्या प्रश्नांवर ते बोलत नाहीत, या शब्दांत अरविंद केजरीवाल यांनी हल्लाबोल केला. 

आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही

आम आदमी पक्षासाठी सत्ता महत्त्वाची नाही. सरकारमध्ये राहिलो की, बाहेर हे महत्त्वाचे नाही. हे येणारा काळच ठरवेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या सर्व गॅरंटी पूर्ण केल्या जातील, याची गॅरंटी देतो. या गॅरंटी सर्वसामान्यांच्या जीवनात महत्त्वाच्या आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तसेच भाजपा सत्तेत परत आल्यास निवडणुका होणार नाहीत किंवा रशिया, बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या निवडणुकांप्रमाणेच होतील, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला. अरविंद केजरीवाल टाइम्स ऑफ इंडियाशी बोलत होते.

दरम्यान, राजीनामा देण्याचा कोणताही विचार नाही. त्यांनी लोकशाहीला तुरुंगात डांबले तर तुरुंगातून लोकशाही कशी चालवायची ते दाखवून देऊ, असा एल्गार अरविंद केजरीवाल यांनी केला.

 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४AAPआपINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी