शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
4
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
5
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
6
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
7
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
8
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
9
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
10
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
11
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
12
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
13
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
14
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
15
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
16
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
17
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
18
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
19
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
20
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई

'ते' पाच मृतदेह आले कुठून?; हत्या, तंत्र मंत्र की आणखी काही?... गूढ वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 12:56 IST

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देएकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे.

नवी दिल्लीः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतल्या भजनपुरा भागात एकाच कुटुंबातील पाच जणांचे मृतदेह सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. प्राथमिक चौकशीत ही आत्महत्या असल्याचं बोललं जात होतं. परंतु शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यांची आत्महत्या नव्हे, तर धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं आहे. सर्वच मृतदेहांच्या मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर जखमेच्या खुणा सापडल्या आहेत. दिल्ली पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून, चौकशी सुरू केली आहे. त्यांची हत्या कोणत्या कारणास्तव करण्यात आली, याचा पोलीस शोध घेत आहेत. भजनपुरा परिसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले होते. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरुषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरुष हा रिक्षा चालक होता, असे सांगण्यात येत आहे. तसेच ते या घरात भाड्यानं राहत असल्याचीही माहिती मिळत आहे. पती-पत्नीशिवाय तीन मुलंसुद्धा इथे राहत होती.

शंभूनाथ (43) आपली पत्नी सुनीता (38)आणि मुलगी कोमल (16)सह मुलगा सचिन (14) आणि छोटा मुलगा शिवमबरोबर इथे राहत होते. त्यांच्या घराला बाहेरून टाळं लावण्यात आलं होतं. घरातून दुर्गंधी येत असल्यानं शेजारच्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी टाळं तोडून घरात प्रवेश केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली.