शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात कॅगचा अहवाल मांडणार"; पंतप्रधान मोदींचा केजरीवालांना जाहीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 21:40 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना इशारा दिला आहे.

Delhi Assembly Elections Result: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपने २७ वर्षानी दिल्ली एवढा मोठा विजय मिळवला. सत्ताधारी आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. नवी दिल्लीतून आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि जंगपुरामधून मनीष सिसोदिया या दिग्गज नेत्यांना निवडणुकीत पराभव व्हावं लागलं. दिल्लीतल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या मुख्यालयातून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. तसेच आप आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांना इशारा देखील दिला आहे.  भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप मुख्यालयात जाऊन कार्यकर्त्यांचे आभार मानले. "हा ऐतिहासिक विजय आहे आणि दिल्लीतून आपदा दूर झाली. दशकभराच्या आपदामधून दिल्ली मुक्त झाली आहे. या निकालात भाजप कार्यकर्त्यांच्या अहोरात्र मेहनत या विजयात भर घालत आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते या विजयासाठी पात्र आहात. या विजयाबद्दल भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे मी खूप खूप अभिनंदन करतो," असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कथित मद्य घोटाळ्यावरुन अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"दिल्लीतील आपदाने जनतेचा विश्वास आणि भावना पायाखाली चिरडल्या. हरियाणातील जनतेवर मोठा आरोप केला. त्यामुळे यमुनेला दिल्लीची ओळख बनवण्याची शपथ मी निवडणूक प्रचारादरम्यान घेतली होती. मला माहित आहे की हे काम कठीण आहे आणि खूप वेळ लागेल. पण कितीही वेळ गेला तरी चालेल. जिद्दीच्या बळावर आपण यमुना स्वच्छ करू आणि यमुना मातेच्या स्वच्छतेसाठी पूर्ण सेवेच्या भावनेने काम करू," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"हे आपदाचे लोक राजकारणात बदल घडवून आणू असे सांगत राजकारणात आले होते. पण ते सरळसरळ बेईमान निघाले. अण्णा हजारे यांचे आजचे विधान मी ऐकलं. आपच्या लोकांच्या दुष्कर्मामुळे त्यांना खूप दिवसांपासून दुखः भोगावे लागत आहे. आज त्यांनाही या दुखण्यातून दिलासा मिळाला असेल. भ्रष्टाचाराविरोधातील चळवळीतून जन्माला आलेला पक्ष भ्रष्टाचारातच अडकला. ज्यांनी स्वतःला प्रामाणिकपणाचे दाखले दिले ते स्वतःच भ्रष्टाचारी निघाले. हा दिल्लीकरांच्या भरवशाचा विश्वासघात होता. दारू घोटाळ्यामुळे दिल्लीची बदनामी झाली. जेव्हा जग कोरोनाशी लढत होते, तेव्हा आपचे लोक शीशमहल बांधत होते. या आपदावाल्यांनी त्यांचा प्रत्येक घोटाळे लपवण्यासाठी रोज नवीन षडयंत्र रचले. पण आता दिल्लीचा जनादेश आला आहे. मी गॅरंटी देत आहे की पहिल्या विधानसभा अधिवेशनातच कॅगचा अहवाल सभागृहात ठेवला जाईल. भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाची चौकशी होणार आहे. ज्याने लूट केली आहे ती परत करावी लागेल," असा इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल