शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान मोदींच्या पाठीशी"; भाजपच्या विजयानंतर CM फडणवीसांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 18:47 IST

आपच्या दारुण पराभवानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

Delhi Assembly Elections 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपने २७ वर्षांनंतर दिल्लीत पुनरागमन केल्याचे आता स्पष्ट झालं आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षालाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दिल्ली निवडणुकीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला असून पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल  मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज आणि इतर अनेक बडे नेतेही पराभूत झाले आहेत. आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी पराभव स्वीकारला असून आपण लोकांसाठी काम करत राहू असे म्हटले आहे. दुसकीकडे या निकालानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं असून आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. त्यामुळे आता दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होणार आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदीया या दोन मोठ्या नेत्यांचाही पराभव झाला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे, असं म्हटल. तसेच भाजपचे सरकार दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल असंही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

"दिल्ली विधानसभेवर २७ वर्षांनी भाजपचा झेंडा रोवला गेला याचा मला अतिशय आनंद आहे. दिल्लीतील भाजपच्या तमाम कार्यकर्त्याचा आणि जनतेचे मी मनापासून अभिनंदन करतो. दिल्लीकरांनी हा विश्वास पंतप्रधान मोदी यांच्यावर दाखवला आहे. या विजयाने आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा बुरखा फाटलेला आहे. सातत्याने खोटी आश्वासने देऊन आणि लोकांना भटकवत ज्या प्रकारे त्यांनी राज्य केलं त्या परंपरेचा आज अंत झालेला आहे.  खोटे राजकारण चालणार नाही हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. मला विश्वास आहे की दिल्लीची जनता लोकसभेतही पंतप्रधान मोदींवरच विश्वास दाखवायची, पण विधानसभेमध्ये आमची कुठेतरी पिछेहाट झाली होती. आता एक मोठा विजय हा दिल्लीतल्या जनतेने दिला आहे. हे विकासाला दिलेलं मत आहे. भारतीय जनता पार्टीचे सरकार हे दिल्लीमध्ये लोकांच्या आशा आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करेल," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"अरविंद केजरीवाल यांनी अण्णा हजारे यांचा हात पकडून भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाच्या माध्यमातून आपलं राजकारण सुरू केलं होतं. त्यानंतर ते भ्रष्टाचाराचे आयकॉन बनले. त्याचे उत्तर दिल्लीच्या जनतेने दिलं आहे. येणाऱ्या दिवसात भाजप दिल्लीकरांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन आणेल," असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

"माझ्या प्रचाराचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ देण्याचे ठरवलं होतं. मला एवढाच आनंद आहे की या यज्ञामध्ये एखादी समिधा माझी पण आहे. त्यात दिल्लीचा मराठी माणूस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभा राहिला याचा मला मनापासून आनंद आहे," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसArvind Kejriwalअरविंद केजरीवाल