शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'आप'नं 15 आमदारांचं तिकीट कापलं, मनीष सिसोदियांनी सांगितलं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 15:22 IST

आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 14 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली : दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने सर्व 70 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे पार्टीकडून 15 विद्यमान आमदारांना या निवडणुकीत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे पार्टीच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

याविषयी बोलताना दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, पार्टीकडून आपल्या स्तरावर सर्व आमदारांच्या कामाचा सर्व्हे करण्यात आला आणि जनतेने दिलेल्या प्रतिसादानुसार तिकिटांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ज्यांचे तिकीट कापण्यात आले आहे, ते आता कोणताही आरोप करत आहेत. त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही, असे मनीष सिसोदिया यांनी एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. 

दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला आहे. यावर बोलताना मनीष सिसोदिया यांनी सांगितले की, ज्या लोकांना काँग्रेस आणि भाजपा यासारख्या पक्षांतून निराशा मिळाली आहे, ते आम आदमी पार्टीत आले आहेत. त्यांची लोकांध्ये असलेली प्रतिमा पाहून त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला.  

याचबरोबर, बदरपूरचे आमदार राहिलेले नारायण दत्त शर्मा यांनी आम आदमी पार्टीवर तिकिट व्रिकीचा आरोप केला आहे. याविषयी मनीष सिसोदिया म्हणाले, "ज्यावेळी कोणाचेही तिकीट कापले जाते, त्यावेळी त्याला थोडीफार निराशा होते. नारायण दत्त शर्मा यांना काही शंका असल्यास आम्ही चर्चेतून दूर करू," याशिवाय, या निडणुकीत आम आदमी पार्टीचा सर्व जागांवर विजय होईल. 70 पैकी 70 जागा आम्ही जिंकू आणि हा तर जनतेचा आवाज आहे. यावेळी तीन जागा सुद्धा सुटणार नाहीत, असेही मनीष सिसोदिया यांनी सांगितले. 

(भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन')

आम आदमी पार्टीने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत 14 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे पतपरगंज येथून  निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. 70 सदस्यसंख्या असलेल्या दिल्ली विधानसभेसाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, 11 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

2015 मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने 67 जागा जिंकत निर्विवाद विजय मिळवला होता. भाजपाला केवळ 3 जागांवर समाधान मानावे लागले होते. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नव्हता. 

महत्त्वाच्या बातम्या 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, '...तर राजकारणातून संन्यास घेईन'  

CAA: मोदींच्या गुजरातमध्ये विरोधाचे पतंग गुल; उडवण्यापूर्वीच पोलिसांकडून जप्त

अर्जुनाच्या बाणांमध्ये होती अणुशक्ती! बंगालच्या राज्यपालांचा दावा

सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा

शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूक