शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:38 IST

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Rahul Gandhi Slam Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आलेली असताना राजधानीतलं राजकीय वातावरणं चांगलेच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतल्या सभेत बोलताना आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल हे एकामागून एक खोटं बोलत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींपेक्षाही हुशार असल्याचे राहुल गांधींनी म्हटलं. तसेच काँग्रेसने दलित आणि मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच सत्तेवर आला नसता, असंही राहुल गांधी म्हणाले.

गुरुवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बादली विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. "अरविंद केजरीवाल तुम्ही ५ वर्षांपूर्वी यमुनेचे पाणी पिण्याचे बोलत होतात. आज कोणीतरी मला सांगितले की ते यमुना नदीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन पत्रकार परिषद घेत आहे. हा पोकळपणा आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

"अरविंद केजरीवाल खोटे बोलत आहेत. पंतप्रधान मोदी जसे खोटे बोलतात तसे केजरीवालही खोटे बोलतात. त्यांच्यात काहीच फरक नाही. केजरीवाल हे मोदींपेक्षा हुशार आहेत. एक गोष्ट विसरू नका की तुमच्या पाठीशी कोण उभं आहे? संविधानाचे रक्षण कोण करतो आणि सत्य कोण बोलतो?," असंही राहुल गांधी म्हणाले.

"माझी गेल्या २० वर्षांची भाषणे तुम्ही पाहा. मनरेगाचे आश्वासन दिले आणि पूर्ण केले. अन्न हक्काचे वचन दिले, ते मिळाले. कर्जमाफीचे आश्वासन दिले, ते मिळाले. कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास देण्याचे आश्वासन पूर्ण झाले. कर्नाटक आणि तेलंगणातील महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे आश्वासन दिले, ते आम्ही पूर्ण केले. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना धानाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते मिळाले," असं राहुल गांधींनी म्हटलं.

"आम्ही दलित आणि अत्यंत मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता तर आरएसएस कधीच सत्तेवर आली नसती. इंदिरा गांधींच्या काळात हा विश्वास पूर्णपणे अबाधित होता. दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक सर्वांना माहीत होते की इंदिराजी त्यांच्यासाठी लढतील. १९९० नंतर विश्वास कमी झाला. काँग्रेसला हे वास्तव स्वीकारावे लागेल. काँग्रेसने ज्या प्रकारे तुमचे हित जपायला हवे होते तसे केले नाही. या विधानाने मला नुकसान होऊ शकते, परंतु मला पर्वा नाही कारण ते खरे आहे," असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी