शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

"अरविंद केजरीवाल पंतप्रधान मोदींपेक्षा हुशार"; दोघांमध्ये फरक नसल्याचे म्हणत राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 19:38 IST

Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक प्रचारसभेत आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Rahul Gandhi Slam Arvind Kejriwal: दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जवळ आलेली असताना राजधानीतलं राजकीय वातावरणं चांगलेच तापलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीतल्या सभेत बोलताना आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अरविंद केजरीवाल हे एकामागून एक खोटं बोलत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटलं. अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान मोदींपेक्षाही हुशार असल्याचे राहुल गांधींनी म्हटलं. तसेच काँग्रेसने दलित आणि मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कधीच सत्तेवर आला नसता, असंही राहुल गांधी म्हणाले.

गुरुवारी काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी बादली विधानसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली. यावेळी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. "अरविंद केजरीवाल तुम्ही ५ वर्षांपूर्वी यमुनेचे पाणी पिण्याचे बोलत होतात. आज कोणीतरी मला सांगितले की ते यमुना नदीच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन पत्रकार परिषद घेत आहे. हा पोकळपणा आहे," असं राहुल गांधी म्हणाले.

"अरविंद केजरीवाल खोटे बोलत आहेत. पंतप्रधान मोदी जसे खोटे बोलतात तसे केजरीवालही खोटे बोलतात. त्यांच्यात काहीच फरक नाही. केजरीवाल हे मोदींपेक्षा हुशार आहेत. एक गोष्ट विसरू नका की तुमच्या पाठीशी कोण उभं आहे? संविधानाचे रक्षण कोण करतो आणि सत्य कोण बोलतो?," असंही राहुल गांधी म्हणाले.

"माझी गेल्या २० वर्षांची भाषणे तुम्ही पाहा. मनरेगाचे आश्वासन दिले आणि पूर्ण केले. अन्न हक्काचे वचन दिले, ते मिळाले. कर्जमाफीचे आश्वासन दिले, ते मिळाले. कर्नाटकात महिलांना मोफत बस प्रवास देण्याचे आश्वासन पूर्ण झाले. कर्नाटक आणि तेलंगणातील महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचे आश्वासन दिले, ते आम्ही पूर्ण केले. छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांना धानाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते मिळाले," असं राहुल गांधींनी म्हटलं.

"आम्ही दलित आणि अत्यंत मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवला असता तर आरएसएस कधीच सत्तेवर आली नसती. इंदिरा गांधींच्या काळात हा विश्वास पूर्णपणे अबाधित होता. दलित, आदिवासी, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक सर्वांना माहीत होते की इंदिराजी त्यांच्यासाठी लढतील. १९९० नंतर विश्वास कमी झाला. काँग्रेसला हे वास्तव स्वीकारावे लागेल. काँग्रेसने ज्या प्रकारे तुमचे हित जपायला हवे होते तसे केले नाही. या विधानाने मला नुकसान होऊ शकते, परंतु मला पर्वा नाही कारण ते खरे आहे," असं राहुल गांधी म्हणाले. 

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकRahul Gandhiराहुल गांधीArvind Kejriwalअरविंद केजरीवालNarendra Modiनरेंद्र मोदी