शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांना मारण्यासाठी विष मिसळलं जाईल का?; युमनेच्या पाण्यावरुन PM मोदींनी केजरीवालांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:09 IST

मी सुद्धा यमुना नदीचे पाणी पितो म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.

PM Narendra Modi Slam Arvind Kejriwal: आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा सरकार यमुना नदीचे पाणी जाणूनबुजून प्रदूषित करत असल्याचा आरोप केला होता. हरिणातील भाजप सरकार यमुना नदीचे पाणी प्रदूषित करून दिल्लीत पाठवत असल्याचा आरोप केजरीवालांनी केला. अरविंद केजरीवाल यांनी यमुना नदीच्या पाण्यावरून केलेल्या वक्तव्यावरुन भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. दुसरीकडे आता यमुनेचे पाणी दूषित केल्याचा दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी सुद्धा यमुनेचे पाणी पितो असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

करतार नगर येथील संकल्प सभेला बोलताना पंतप्रधान मोदींनी यमुनेच्या पाण्यावरून आम आदमी पक्षाच्या सरकारला धारेवर धरले. त्यांची बोट यमुनेतच बुडेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. यमुनेत विष मिसळल्याच्या दाव्याला हरियाणाचा अपमान असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदींनी, तेही तेच पाणी पितात, न्यायाधीश आणि परदेशी राजदूतही तेच पाणी पितात, त्यांना मारण्यासाठी विष मिसळले जाईल का? असा सवाल केला.

"राजकीय स्वार्थासाठी या गुन्हेगारांनी आणखी एक गंभीर पाप केले आहे. हे पाप कधीही माफ होणार नाही. इतिहासही त्यांना कधीच माफ करणार नाही. आज तुमच्या शिष्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला, तुमच्या इको-सिस्टमने ते लपवण्याचा प्रयत्न केला तरी देश मात्र हे विसरू शकणार नाही, दिल्लीही विसरू शकणार नाही. हरियाणातील प्रत्येकजण हे विसरू शकत नाही. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी हरियाणातील जनतेवर घृणास्पद आरोप केलेत. पराभवाच्या भीतीने ते हैराण झालेत. हरियाणातील लोक दिल्लीपेक्षा वेगळी आहेत का? हरियाणातील लोकांची कुटुंबे आणि मुले दिल्लीत राहत नाहीत का? हरियाणातील लोक त्यांच्या मुलांच्या पाण्यात विष मिसळू शकतात का?," असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

"गेल्या ११ वर्षांपासून पंतप्रधानही हेच पाणी पितोय. हरियाणावरुन पाठवलेलं पाणी दिल्लीत राहणारे न्यायाधीश, सर्व आदरणीय सदस्य, परदेशी राजदूतही पितात. हरियाणातील भाजप सरकारने मोदींना विष देण्यासाठी पाण्यात विष टाकले आहे, असे कोणी विचार तरी करू शकेल का? काय म्हणताय तुम्ही? देशातील न्यायाधीशांना विष पाजून मारण्याचा कट केला जातोय का?," असा सवालही पंतप्रधान मोदींनी केला.

दरम्यान, सोमवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळल्याचा आरोप केला. हे पाणी सीमेवर थांबवले नसते तर दिल्लीत मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला असता, असं केजरीवाल म्हणाले. या दाव्यावर निवडणूक आयोगाने अरविंद केजरीवाल यांच्याकडून पुरावे मागवले आहेत. दिल्ली भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार करत प्रचारावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Delhi Assembly Election 2025दिल्ली निवडणूक 2025delhi electionदिल्ली निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल