शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 15:00 IST

काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

ठळक मुद्देकोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास भारतीय सैन्य सज्ज - राजनाथ सिंहसंरक्षण विभाग आणि भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणावर भरबेंगळुरू येथील कार्यक्रमात मांडली आपली मते

बेंगळुरू : काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित एरो-इंडिया २०२१ या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह बोलत होते. 

गेल्या काही महिन्यांपासून निर्धारित नसलेल्या सीमांवर बळाचा वापर करून एकतर्फीपणे त्यात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, काही झाले, तरी देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

पाकिस्तानावर टीका

आताच्या घडीला भारत विविध आघाड्यांवर अनेकविध अडचणी, आव्हाने यांना सामोरा जात आहे. पाकिस्तान दहशतवादाला छुप्या पद्धतीने पाठबळ देत आहे. जागतिकदृष्ट्या हे घातक आहे. दहशतवादाचा राजकीय फायद्यासाठी पाकिस्तान करत असलेला वापर आता त्यांच्यासाठी सामान्य बाब झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद

भारतीय सैन्याची ताकद वाढवणे आणि अधिकाधिक वस्तू भारतात तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आगामी सात ते आठ महिन्यात सुमारे १३० अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, भारत-चीन सीमावादावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. लडाख येथे चीनने भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापटही झाली. मात्र, भारताने चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंहKarnatakकर्नाटकIndian Armyभारतीय जवान