शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
4
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
5
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
6
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
7
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
8
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
9
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
10
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
11
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
12
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
13
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
14
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
15
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
16
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
17
Malegaon Municipal Corporation Election : दोन्ही ठाकरे बंधूंची झाली युती; मालेगाव पालिकेत प्रभाव किती? मनोमिलनानंतर शांतता
18
"ते माझं भवितव्य बरबाद करतील...", 'इंडियन आयडल' जिंकल्यानंतर अभिजीत सावंतने केलेला मोठा गौप्यस्फोट
19
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
20
अरे हे काय! मुंबईच्या संघात दोन-दोन रोहित; व्हायरल फोटो पाहून चाहते थक्क, हिटमॅनचा 'ड्युप्लिकेट' कोण?
Daily Top 2Weekly Top 5

देशाच्या अखंडतेबाबत तडजोड नाही, शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास सैन्य सक्षम: राजनाथ सिंह

By देवेश फडके | Updated: February 3, 2021 15:00 IST

काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

ठळक मुद्देकोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास भारतीय सैन्य सज्ज - राजनाथ सिंहसंरक्षण विभाग आणि भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणावर भरबेंगळुरू येथील कार्यक्रमात मांडली आपली मते

बेंगळुरू : काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. कर्नाटकातील बेंगळुरू येथे आयोजित एरो-इंडिया २०२१ या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना राजनाथ सिंह बोलत होते. 

गेल्या काही महिन्यांपासून निर्धारित नसलेल्या सीमांवर बळाचा वापर करून एकतर्फीपणे त्यात बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब दुर्दैवी आहे. मात्र, काही झाले, तरी देशाच्या अखंडतेचे रक्षण करण्यासाठी आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सक्षम आहे, असेही राजनाथ सिंह यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

पाकिस्तानावर टीका

आताच्या घडीला भारत विविध आघाड्यांवर अनेकविध अडचणी, आव्हाने यांना सामोरा जात आहे. पाकिस्तान दहशतवादाला छुप्या पद्धतीने पाठबळ देत आहे. जागतिकदृष्ट्या हे घातक आहे. दहशतवादाचा राजकीय फायद्यासाठी पाकिस्तान करत असलेला वापर आता त्यांच्यासाठी सामान्य बाब झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. 

"शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशही झुकले"; गुलाम नबी आझाद यांनी संसदेत मोदींना सुनावलं

संरक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद

भारतीय सैन्याची ताकद वाढवणे आणि अधिकाधिक वस्तू भारतात तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. संरक्षण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी आगामी सात ते आठ महिन्यात सुमारे १३० अब्ज डॉलर खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी यावेळी दिली. 

दरम्यान, भारत-चीन सीमावादावर अद्यापही ठोस तोडगा निघालेला नाही. लडाख येथे चीनने भारतात घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडला आहे. भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापटही झाली. मात्र, भारताने चीनच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिले. 

टॅग्स :Defenceसंरक्षण विभागRajnath Singhराजनाथ सिंहKarnatakकर्नाटकIndian Armyभारतीय जवान