शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अर्थव्यवस्थेची घसरण नोेटाबंदीमुळेच, जीएसटीमधील त्रुटी तात्काळ दूर व्हाव्यात - डॉ. मनमोहन सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 05:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागली, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले.

मोहाली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था उतरणीला लागली, असे प्रतिपादन माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केले. या धाडसाची तांत्रिक वा आर्थिकदृष्ट्या काहीच गरज नव्हती असेही त्यांनी स्पष्ट केले.मोहाली येथील इंडियन स्कूल आॅफ बिझनेस लीडरशिप समिटमध्ये डॉ. सिंग म्हणाले की, जेव्हा तुम्ही चलनातील तब्बल ८६% नोटा मागे घेता वा एका रात्रीत बाद ठरवता, तेव्हा सध्या दिसत आहेत, तसे परिणाम अटळच असतात.जीएसटीविषयी बोलताना माजी पंतप्रधान म्हणाले की, या करपद्धतीमुळे आपल्याला भविष्यात त्याचे फायदे दिसतील. मात्र त्यासाठी त्यात तात्काळ काही बदल करणेही गरजेचे आहे. सध्याच्या जीएसटीमध्ये अनेक त्रुटी असून, त्याचा लोकांना त्रास तर सहन करावा लागतच आहे, शिवाय अर्थव्यवस्थेलाही फटका बसल्याचे जाणवत आहे.डॉ. सिंग यांनी आपल्या काळातील आर्थिक स्थितीचा आकडेवारीसह आढावाही घेतला. ते म्हणाले की, आम्ही सत्तेत असताना गुंतवणुकीचा दर ३५-३७ टक्के होता. आता तो ३0 टक्क्यांवर आला आहे. खासगी गुंतवणुकीत वाढ होतानाच दिसत नाही. देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातही गुंतवणूक होण्याची मोठी गरज आहे. मात्र विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी केवळ सार्वजनिक क्षेत्रावर विसंबून राहता येणार नाही. आपल्याला परकीय चलनाकडेही लक्ष द्यावे लागेल. (वृत्तसंस्था)सार्वजनिक आरोग्यावर खर्च आवश्यककेंद्र सरकार सार्वजनिक आरोग्यावर पुरेसा खर्च करत नसल्याबद्दल चिंता व्यक्त करून डॉ. मनमोहन सिंग म्हणाले की, पायाभूत सुविधा व सार्वजनिक आरोग्य यांच्यावर भर देण्याची गरज आहे.

टॅग्स :Note Banनोटाबंदी