शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

‘पाच वर्षांहून अधिक काळ प्रलंबित विधेयक रद्दबातल ठरवावे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2019 02:08 IST

उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांची सूचना

नवी दिल्ली : राज्यसभेमध्ये पाच वर्षांहून अधिक काळ मंजुरीविना प्रलंबित राहिलेले कोणतेही विधेयक रद्दबातल ठरविण्यात यावे, अशी सूचना उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी केली.ते म्हणाले की, लोकसभेने संमत केलेले; पण राज्यसभेत प्रलंबित राहिलेले विधेयक लोकसभा बरखास्त होताच रद्दबादल होते. या नियमाबद्दलही चर्चा होणे आवश्यक आहे. संसदेच्या सभागृहांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांंमुळे अमूल्य वेळ फुकट जातो. हे वातावरण बदलायला हवे. लोकशाही दुबळी करण्याचे हे प्रकार यापुढे थांबवायला हवेत. सोळावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर राज्यसभेत प्रलंबित असलेली २२ विधेयके रद्दबादल झाली. अजूनही ३३ विधेयके राज्यसभेत मंजुरी न मिळाल्याने प्रलंबित आहेत. त्यातील तीन विधेयके तर गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ प्रलंबित आहेत.लोकसभेच्या पाच वर्षांच्या काळात मंजूर झालेली जी विधेयके राज्यसभेत मंजूर झाली नाहीत ती लोकसभा बरखास्त होताच रद्दबातल होतात. मात्र, राज्यसभेत प्रथम मांडलेले विधेयक लोकसभा बरखास्त होवो न होवो, ते रद्दबादल होत नाही. तशी तरतूद राज्यघटनेतच आहे.

टॅग्स :Parliamentसंसद