शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

येडियुरप्पांनी घेतलेले निर्णय तूर्त तरी राहणार अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 00:41 IST

मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अंमलात येणार का, हे उद्या, शनिवारी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येते का, यानंतरच स्पष्ट होईल.

बंगळुरू : मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेताच येडियुरप्पा यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा अंमलात येणार का, हे उद्या, शनिवारी त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता येते का, यानंतरच स्पष्ट होईल. बहुमत सिद्ध करेपर्यंत कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये, असे सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पांना बजावले आहे.येडियुरप्पा यांनी शपथविधीनंतर काल लगेचच अतिरिक्त मुख्य सचिवपदी एम. लक्ष्मीनारायण यांची नेमणूक केली आणि त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी दिली. त्याखेरीज त्यांनी काही आयएएस व आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या केल्या. बहुमत सिद्ध होण्याआधी हे करण्याची काय गरज होती, असा सवाल हे अधिकारीच विचारत आहेत. या बदल्यांचे काय होणार, हे मात्र अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.शेतकºयांचे १ लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणाही त्यांनी केली. ती लगेच अंमलात येणारच नाही. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास मदत व्हावी, यासाठी एका अँग्लो इंडियन सदस्याची नेमणूक करण्याच्या दृष्टीनेही येडियुरप्पा यांनी हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी राज्यपालांकडे एका नावाची शिफारस केली होती आणि राज्यपाल वजुभाई वाला यांनी त्यास संमतीही दिली होती. त्यालाही सर्वोच न्यायालयाच्या निर्णयामुळे खो बसला आहे. बहुमत सिद्ध होईपर्यंत ही नेमणूक करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.गुप्तचर तसेच भ्रष्टाचारविरोधी विभागातील महत्त्वाच्या जागांवर आपल्याला हव्या त्या अधिका-यांना आणण्याचे काम येडियुरप्पा यांनी एका आदेशाद्वावारे केले होते. बदल्यांच्या या निर्णयांना धोरणात्मक निर्णय म्हणायचे की प्रशासकीय निर्णय म्हणायचे, असा प्रश्न अधिकाºयांनाच पडला आहे. शिवाय हा प्रशासकीय निर्णय असला तरी त्याची आता अंमलबजावणी केल्यास न्यायालयाकडून बोलणी ऐकून घ्यावी लागतील, अशी भीती अधिकाºयांना वाटत आहे. एक अधिसूचना काढून येडियुरप्पा यांनी या बदल्या केल्या आहेत. गुप्तचर विभाग आणि भ्रष्टाचार विरोधी ब्युरो या महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या मजीर्तील अधिका?्यांना आणल्याचं सांगण्यात येतं.दरम्यान, येडियुरप्पा यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं आजच सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांनी घेतलेले निर्णय बाद ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.>खेळी उधळली गेलीराज्यघटनेच्या अनुच्छेद ३३३ अन्वये विधानसभेवर एका अँग्लो इंडियन सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार राज्यपालांना आहे. त्या नावाची शिफारस सरकार करते. पण बहुमत सिद्ध होण्याआधी ही नियुक्ती करणे योग्य नाही, असे नमूद करीत काँग्रेसने त्यास आक्षेप घेतला होता. या आमदाराचा उपयोग बहुमत सिद्ध करण्यासाठीच केला जाणार, हे उघड होते. पण न्यायालयाने ही खेळीच उधळून लावली.

> या निर्णयांना बसला खोलगेचच अतिरिक्त मुख्य सचिवपदी एम. लक्ष्मीनारायण यांची नेमणूक, त्यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी काही आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या शेतक-यांचे १ लाख रुपयांपर्यंतची कर्जे माफ करण्याची घोषणा एका अँग्लो इंडियन सदस्याची नेमणुकीसाठी राज्यपालांकडे नावाची शिफारस गुप्तचर तसेच भ्रष्टाचारविरोधी विभागात महत्त्वाच्या जागांवर सोयीच्या अधिकाºयांना आणण्यासाठी काढला आदेश

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पा