शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

मोरारजींनीही घेतला होता असा निर्णय

By admin | Updated: November 10, 2016 04:50 IST

मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे देशात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. तथापि, मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत

दिल्ली : मोदी सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द केल्यामुळे देशात उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. तथापि, मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत. त्यांच्यापूर्वी मोरारजी देसाई यांनी १९७८ मध्ये १ हजार आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या आणि तेव्हाही आता प्रमाणेच लोक आश्चर्यचकित झाले होते. तो काळ होता आणीबाणीनंतरचा. जनता पार्टी सरकार सत्तेवर आल्याच्या त्या काळात १ हजार, ५ हजार आणि १० हजार रुपयांच्या नोटा चलनात होत्या. अधिक रकमेच्या नोटांमुळे भ्रष्टाचार आणि बेहिशेबी पैशांचे व्यवहार फोफावल्याचा फिडबॅक मिळाल्याने देसाई सरकारने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानपदासह अर्थखातेही देसार्इंकडे होते. त्यांनी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावून मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत मंत्र्यांनी कमालीची गुप्तता पाळली. तत्कालीन राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी १६ जानेवारी १९७८ रोजी याबाबतचा वटहुकूम काढून, तो त्वरित लागू केल्यानंतरच याची वाच्यता झाली. आताप्रमाणेच तेव्हाही निर्णयाच्या दुसऱ्या दिवशी सर्व बँकांना सुट्टी देण्यात आली होती. स्वातंत्र्यापासून सतत सत्तेवर राहिलेला काँग्रेस पक्ष तेव्हा विरोधी बाकावर होता आणि काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण विरोधी पक्षनेते होते. चव्हाण यांनी मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तथापि, काँग्रेसने मोठ्या रकमेच्या नोटा रद्द करण्यावर टीका केली हे उल्लेखनीय. 1978 मध्ये चलनातून गायब झालेल्या १ हजार रुपयांच्या नोटेचे अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात चलनात पुनरागमन झाले. १ हजार रुपयांच्या नोटेमुळे आर्थिक व्यवहार सुलभ होतील, असे सांगत वाजपेयी सरकारने नोव्हेंबर २००० मध्ये या नोटा पुन्हा चलनात आणल्या. तत्पूर्वी आॅक्टोबर १९८७ मध्ये ५०० रुपयांची नोट चलनात आली होती. 1तेव्हाच्या आणि आताच्या निर्णयात एवढाच फरक आहे की, १९७८ मध्ये दक्षिण मुंबईत एक हजार रुपयांत ५ चौरस फूट जागा खरेदी करता येत असे आणि आज या भागात तेवढ्या पैशात इंचभरही जागा मिळत नाही. तेव्हा सोने आणि वस्तूंचे भाव गडगडले होते. मात्र, त्याचा परिणाम मर्यादित होता. देसाई आणि मोदी यांच्या निर्णयातील आणखी एक फरक म्हणजे देसार्इंनी नवी कोणतीही नोट चलनात आणली नव्हती. मात्र, मोदी २ हजार रुपयांची नोट चलनात आणत आहेत. 2तेव्हाच्या व आताच्या निर्णयातील एक साम्य म्हणजे मोठ्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेणारे पहिले पंतप्रधान देसाई गुजरातचे होते, मोदीही गुजरातचेच आहेत.