शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नोटा रद्द करण्याचा निर्णय जनतेच्या हिताचाच : मोदी

By admin | Updated: November 15, 2016 02:16 IST

पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कुठल्या कायद्याच्या आधारे हा निर्णय घेतला, असा प्रश्न मला काँग्रेसचे नेते विचारत आहेत

गाझीपूर : पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कुठल्या कायद्याच्या आधारे हा निर्णय घेतला, असा प्रश्न मला काँग्रेसचे नेते विचारत आहेत, पण काँग्रेसने ते सत्तेवर असताना चार आणे बंद केले होते. त्या वेळी कोणता कायदा लावला होता, असा माझा त्यांना सवाल आहे. तुम्ही २५ पैशांच्या पुढे गेला नाहीत. तुम्ही तुम्हाला साजेल असेच काम केले. आम्ही मात्र, आमच्या बरोबरीचे काम केले आणि त्यामुळे काळ्या पैशाला पायबंद बसणार आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गाझीपूरमध्ये सोमवारी झालेल्या सभेत काढले. या सभेत मोदी यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, ‘काँग्रेसने या देशात १९ महिने आणीबाणी लावली होती. त्या काळात तुमचे नेते व कार्यकर्ते यांनी जनतेचा पैसा हडप केला. संपूर्ण देशाला तुरुंग बनवून टाकला होता. काँगेसला सरकारच्या हेतूवर शंका घेण्याचा कोणताही अधिकार नाही.’ पाकस्तानचे नाव न घेता, पंतप्रधान म्हणाले की, ‘सीमेपलीकडे बनावट नोटा छापल्या जात होत्या. हा पैसा दहशतवाद, नक्षलवाद पसरवण्यास वापरला जात होता. देशाविरोधात सुरू असलेला पैशाचा हा वापर थांबवणे आवश्यक होते. त्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला.’ (वृत्तसंस्था) मोदी म्हणाले की... च्५00 आणि १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, त्या बदलून घेण्यासाठी सध्या गरीब जनतेला, सर्वसामान्यांना जो त्रास होत आहे, त्याची मला पुरेपूर कल्पना आहे. च्मला त्याच्या भरपूर वेदना होत आहेत. गरीब व सर्वसामान्यांचा होणारा त्रास कमी करण्यासाठी मी आणि माझे सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहोत. च्पण आमची मोहीम या देशातून काळ्या पैशांचे उच्चाटन करणे ही आहे. त्यासाठी मला फक्त ५० दिवस हवे आहेत. च्जनतेला त्रास होत असला, तरी तेवढा वेळ देण्यास जनतेची तयारी आहे, त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठिशी आहेत.