शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून वाद

By admin | Updated: December 4, 2015 08:39 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद

कोलकाता/नवी दिल्ली: अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. संघ देशाच्या धार्मिक ऐक्याला तडा देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर भाजपाला राममंदिराचा मुद्दा केवळ जिवंत ठेवायचा असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला.भागवत यांनी बुधवारी कोलकात्यात १९९० च्या कारसेवेदरम्यान पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेले राम आणि शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाणार असून आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहू आणि यासाठी आम्हाला सज्ज राहायचे आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या आर्थिक क्षमतेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील राममंदिर भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहे,अशी भावना भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.राजकारणासाठी वापर-काँग्रेसदरम्यान सरसंघचालकांच्या या वक्तव्याची लागलीच दखल घेत संघ परिवाराकडून अशाप्रकारच्या वक्तव्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले. अशाप्रकारची वक्तव्ये केवळ चिथावणीसाठीच केली जात असून ती देशाच्या ऐक्याला बाधक आहेत,असा आरोप काँग्रेसने नेते पी.सी. चाको यांनी केला. तर पक्षाचे दुसरे नेते दिग्विजयसिंग यांनी भाजपा आणि संघ राममंदिराच्या मुद्यावर देशाची दिशाभूल करीत असून त्याचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा दावा केला.मुद्दा जिवंत ठेवायचाय-नितीशकुमारभाजपाच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा असण्याचे कारण नाही. त्यांना राजकीय लाभासाठी हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात केला. ते म्हणाले, त्यांनी श्रीरामाला भाजपाच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली. राममंदिरावर न्यायालयाच्या निर्णयाने अथवा परस्पर सहमतीनेच तोडगा निघू शकतो,हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. पण असे न करता ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे’ अशी त्यांची भूमिका आहे,अशी टीका नितीशकुमार यांनी केली.