शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून वाद

By admin | Updated: December 4, 2015 08:39 IST

अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद

कोलकाता/नवी दिल्ली: अयोध्येतील रामजन्मभूमीवर माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाईल, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. संघ देशाच्या धार्मिक ऐक्याला तडा देत असल्याचा आरोप काँग्रेसने केला तर भाजपाला राममंदिराचा मुद्दा केवळ जिवंत ठेवायचा असल्याचा टोला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी लगावला.भागवत यांनी बुधवारी कोलकात्यात १९९० च्या कारसेवेदरम्यान पोलीस गोळीबारात मृत्युमुखी पडलेले राम आणि शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात बोलताना राम मंदिराचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, माझ्या हयातीत राम मंदिर उभारले जाणार असून आम्ही आमच्या डोळ्यांनी ते पाहू आणि यासाठी आम्हाला सज्ज राहायचे आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेच्या आर्थिक क्षमतेचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे अयोध्येतील राममंदिर भारताच्या संस्कृतीचे प्रतीक आहे,अशी भावना भागवत यांनी यावेळी व्यक्त केली.राजकारणासाठी वापर-काँग्रेसदरम्यान सरसंघचालकांच्या या वक्तव्याची लागलीच दखल घेत संघ परिवाराकडून अशाप्रकारच्या वक्तव्याची ही काही पहिलीच वेळ नसून यापूर्वीही अनेकदा हा मुद्दा उचलून धरण्यात आला आहे, याकडे काँग्रेसने लक्ष वेधले. अशाप्रकारची वक्तव्ये केवळ चिथावणीसाठीच केली जात असून ती देशाच्या ऐक्याला बाधक आहेत,असा आरोप काँग्रेसने नेते पी.सी. चाको यांनी केला. तर पक्षाचे दुसरे नेते दिग्विजयसिंग यांनी भाजपा आणि संघ राममंदिराच्या मुद्यावर देशाची दिशाभूल करीत असून त्याचा केवळ राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा दावा केला.मुद्दा जिवंत ठेवायचाय-नितीशकुमारभाजपाच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा असण्याचे कारण नाही. त्यांना राजकीय लाभासाठी हा मुद्दा जिवंत ठेवायचा आहे, असा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटण्यात केला. ते म्हणाले, त्यांनी श्रीरामाला भाजपाच्या सदस्याप्रमाणे वागणूक दिली. राममंदिरावर न्यायालयाच्या निर्णयाने अथवा परस्पर सहमतीनेच तोडगा निघू शकतो,हे स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी या दिशेने प्रयत्न केले पाहिजेत. पण असे न करता ‘मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे’ अशी त्यांची भूमिका आहे,अशी टीका नितीशकुमार यांनी केली.