शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

दगडफेकीत पर्यटकाचा मृत्यू; काश्मीरची स्थिती चिघळली, अनेक भागांत निर्बंध लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 01:44 IST

शोपियांमध्ये रविवारच्या चकमकीत ठार झालेले पाच दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू यांमुळे श्रीनगर व आसपासच्या शहरांत वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. जवानांच्या गोळीबारातील आणखी एका जखमीचे मंगळवारी निधन झाल्याने तणाव वाढला असून, जवळपास संपूर्ण खोऱ्यात पोलिसांनी अनेक निर्बंध जारी केले आहे.

श्रीनगर - शोपियांमध्ये रविवारच्या चकमकीत ठार झालेले पाच दहशतवादी व सुरक्षा दलांच्या गोळीबारात स्थानिक नागरिकांचा झालेला मृत्यू यांमुळे श्रीनगर व आसपासच्या शहरांत वातावरण अधिकच चिघळू लागले आहे. जवानांच्या गोळीबारातील आणखी एका जखमीचे मंगळवारी निधन झाल्याने तणाव वाढला असून, जवळपास संपूर्ण खोऱ्यात पोलिसांनी अनेक निर्बंध जारी केले आहे.स्थानिक तरुणांच्या दगडफेकीत एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याने तेथील दुकानदार, हॉटेल व्यावसायिकही घाबरून गेले आहेत. पर्यटन संस्था व पर्यटकांतही भीती आहे. उन्हाळ्यात लाखो पर्यटक काश्मीरमध्ये जातात. अशा वेळीच वातावरण बिघडवून टाकण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे या दगडफेकीमागेही अतिरेकी गट आहे की काय, अशी शंका घेतली जात आहे.बडगाममध्ये पर्यटकांच्या वाहनावर दगडफेक झाली. त्यात तामिळनाडूचा एक पर्यटक मरण पावला. दोघे जखमी झाले. या घटनेचा मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती व माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी निषेध केला. मुफ्ती यांनी रुग्णालयात मृत पर्यटकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि जखमींची चौकशी केली. पर्यटकांवर दगडफेक करणारे काश्मीरचे समर्थक नव्हेत, तर गुंड आहेत, अशी टीका त्यांनी केली.फुटीरवादी नेते मिरवाइज उमर फारुख, सय्यद शाह अली गिलानी व यासिन मलिक यांनीही दगडफेकीचा निषेध केला आहे. पर्यटकांशी असे वागणे ही काश्मिरींची संस्कृती नाही, असे फारुख यांनी म्हटले आहे.हिंसाचाराच्या घटनांना पीडीपी व भाजपाची अभद्र युती कारणीभूत आहे. त्यामुळे तुम्ही भाजपाची साथ सोडून द्यावी, असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी मुख्यमंत्री मुफ्ती यांना केलेआहे. (वृत्तसंस्था)जमावबंदी, इंटरनेट सेवा स्थगितरविवारच्या चकमकीनंतर जवानांच्या गोळीबारात पाच जणांचा मृत्यू झालाच होता. आज आणखी एक जण मरण पावला. त्यामुळे मृतांची संख्या ६ झाल्याने पुन्हा खोºयामध्ये तणाव वाढला आहे. तिथे रविवारपासून निर्बंध लागू आहेत. सात पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात जमावबंदी लागू असून, इंटरनेट सेवाही बंदही आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरnewsबातम्या