शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
3
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
4
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
5
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
6
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
7
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
8
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
9
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
10
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
11
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
12
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
13
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
14
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
15
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
16
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
17
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
18
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
19
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
20
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...

मणिपूर हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 05:36 IST

राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.

इम्फाळ : मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या हिंसाचारात मरण पावलेल्यांची संख्या ५४वर पोहोचल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. राज्यात शनिवारी जनजीवन पूर्वपदावर आले असून दुकाने व व्यवहार पुन्हा सुरू झाले.

या राज्यातील हिंसाचारग्रस्त भागांमध्ये लष्कर, निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. इम्फाळमध्ये सर्व बाजारपेठा खुल्या झाल्या असून लोकांनी भाजी, धान्य आदी जीवनावश्यक वस्तूंची खरेदी केली. ५४ मृतांपैकी १६ जणांचे मृतदेह चुराचंदपूर जिल्हा रुग्णालयातील तर १५ मृतदेह इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या शवागारात ठेवण्यात आली आहेत.

पाच बंडखोर ठार

चुराचंदपूर जिल्ह्यात शुक्रवारी लष्कर व बंडखोरांत झालेल्या चकमकींत ५ बंडखाेर ठार झाले तर सुरक्षा दलाचे २ जवान जखमी झाले.

हिंसाचारग्रस्त भागांमध्ये अडकलेल्या १३ हजार लोकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. चुराचंदपूर, मोरेह, काकचिंग, कांगपोक्पी या हिंसाचारग्रस्त भागांतील परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.