शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: July 12, 2017 07:50 IST

बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 12 - बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खात्मा करण्यात आलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांची नावं दाऊद आणि जावेद अशी आहेत. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याची माहिती समोर येतेय. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बडगाममधल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनी प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक शस्त्रसाठा आणि बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा जवानांना मंगळवारी रात्री एका गावात दहशतवाद्यांना घेरलं होतं. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरूच होता. एका पोलीस अधिका-याच्या माहितीनुसार, सोमवारी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान एका गावात तपासणी करत असताना मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी लपून बसलेल्या गावाला घेरलेल्या टीममध्ये सीआरपीएफ, लष्कराचं अँटी टेरर युनिट, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. सीआरपीएफ अधिका-याच्या माहितीनुसार, 176 बटालियनचे जवान, राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीसोबत तपास अभियान राबवत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

संबंधित बातम्या
दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण

अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

दोन दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर लष्कर-ए-तय्यबानेच हल्ला घडवून आणला होता, अबू इस्माईल त्याचा मुख्य सूत्रधार होता, असे उघड झाले आहे. या हल्ल्यात प्रचंड मनुष्यहानी व्हावी, असा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. एकाच बसमध्ये 58 प्रवासी असल्याने तसे शक्य होते. पण बसचा चालक सलीम शेख याने गोळीबार सुरू असताना प्रसंगावधान दाखवून बस वेगाने पुढे नेल्याने अनेकांचे प्राण वाचले.सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर तीन पोलिसांसह 32 जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.