शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सुरक्षा दलांबरोबरच्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

By admin | Updated: July 12, 2017 07:50 IST

बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे.

ऑनलाइन लोकमतजम्मू-काश्मीर, दि. 12 - बडगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली आहे. सुरक्षा जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, खात्मा करण्यात आलेल्यांपैकी दोन दहशतवाद्यांची नावं दाऊद आणि जावेद अशी आहेत. खात्मा करण्यात आलेले दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंधित असल्याची माहिती समोर येतेय. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बडगाममधल्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरक्षा जवानांनी राबवलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. त्याच वेळी जवानांनी प्रत्युत्तर देत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.मंगळवारी रात्रीपासून सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात विस्फोटक शस्त्रसाठा आणि बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. सुरक्षा जवानांना मंगळवारी रात्री एका गावात दहशतवाद्यांना घेरलं होतं. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरूच होता. एका पोलीस अधिका-याच्या माहितीनुसार, सोमवारी अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. त्याचदरम्यान एका गावात तपासणी करत असताना मंगळवारी संध्याकाळी 7.30 वाजता दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्याच वेळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. दहशतवादी लपून बसलेल्या गावाला घेरलेल्या टीममध्ये सीआरपीएफ, लष्कराचं अँटी टेरर युनिट, राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीरमधील पोलीस कर्मचा-यांचा समावेश होता. सीआरपीएफ अधिका-याच्या माहितीनुसार, 176 बटालियनचे जवान, राष्ट्रीय रायफल्स आणि एसओजीसोबत तपास अभियान राबवत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

संबंधित बातम्या
दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण

अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार

दोन दिवसांपूर्वी अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर लष्कर-ए-तय्यबानेच हल्ला घडवून आणला होता, अबू इस्माईल त्याचा मुख्य सूत्रधार होता, असे उघड झाले आहे. या हल्ल्यात प्रचंड मनुष्यहानी व्हावी, असा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. एकाच बसमध्ये 58 प्रवासी असल्याने तसे शक्य होते. पण बसचा चालक सलीम शेख याने गोळीबार सुरू असताना प्रसंगावधान दाखवून बस वेगाने पुढे नेल्याने अनेकांचे प्राण वाचले.सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला, तर तीन पोलिसांसह 32 जखमी झाले. या हल्ल्याच्या वेळी यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस सलीम नावाचा चालक चालवत होता. बसचालक सलीमने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबारात ही बस सापडल्यानंतरही चालकाने बस चालविणं सुरूच ठेवलं होतं. बसमध्ये असलेल्या यात्रेकरूंचा जीव वाचविण्यासाठी त्याने बस थांबवली नाही. जर सलीमने त्यावेळी बस थांबवली असती तर जिवीतहानी वाढली असती, अशी माहिती समोर येते आहे. गोळीबार होत असताना सलीमने बस चालवत ती सुरक्षादलाच्या कॅम्पपर्यंत पोहचवली. तेथिल काही यात्रेकरूंनीही सलीमने केलेल्या कामाचं कौतुक केलं आहे.