शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेससाठी फाशीचा फंदा!

By admin | Updated: October 5, 2015 12:24 IST

बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक म्हणजे राष्ट्रीय जनता दलासाठी (राजद) ‘करो या मरो’ची लढाई झाली आहे. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या नोटीसला न जुमानता राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव ही निवडणूक म्हणजे सवर्ण आणि मागासवर्गीयांची लढाई असल्याचे सांगून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे महाआघाडीत सहभागी काँग्रेसची अडचण मात्र वाढली आहे.यादव यांच्या जातीय कार्डमुळे काँग्रेसचे नेते आणि उमेदवार चिंतित आहेत. या मुद्द्यावर स्वत:ला राजदपासून दूर ठेवण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शनिवारी कहलगाव (भागलपूर), वजीरगंज (गया) येथील सभा तसेच उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या ७ आॅक्टोबरला बछवाडा (बेगुसराय), बरबीघा (शेखपुरा) आणि चेनारी (रोहतास) येथे होणाऱ्या सभांसाठी राजदच्या कुठल्याही नेत्यास औपचारिक आमंत्रण देण्यात आलेले नाही. दुसरीकडे मागासवर्गीयांचे ध्रुवीकरण करण्याच्या राजदच्या उघड प्रयत्नांमुळे सवर्णांची मते गमविण्याच्या भीतीने काँग्रेस नेते सध्या ‘डॅमेज कंट्रोल’मध्ये व्यस्त आहेत. उच्चवर्णीयांमधील गरीब लोकांना आरक्षण देण्यास आपल्या पक्षाचा पाठिंबा असल्याचे काँग्रेसचे प्रसिद्धी प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांनी गुरुवारी स्पष्ट केले होते. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्यातही याचा उल्लेख होता.काँग्रेसचे बहुतांश उमेदवार शहरी आणि निमशहरी भागातील असून, हा या पक्षासाठी सर्वांत चिंतेचा विषय आहे. कारण महाआघाडीत काँग्रेसला मिळालेल्या ४१पैकी १७ जागांवर निकालाचे भवितव्य सवर्णांच्या मतदानावर अवलंबून आहे; आणि या मतदारसंघांमध्ये काँग्रेसची थेट लढत भाजपासोबत आहे. त्यामुळे या जागांवरील काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. सवर्ण आणि मागासवर्गीयांच्या आधारे मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी लालूप्रसाद यादव करीत असलेली वक्तव्ये थांबविण्याच्या दृष्टीने पक्षश्रेष्ठींनी दबाव आणावा अशी या उमेदवारांची इच्छा आहे. यादव यांची बयाणबाजी सुरू राहिल्यास पक्षाचे फार मोठे नुकसान होईल, अशी धोक्याची सूचना अनेक उमदवारांनी पत्राद्वारे दिली आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही या उमेदवारांची मागणी आहे. (वृत्तसंस्था)भाजपाची कसोटी- ४१पैकी २८ जागांवर काँग्रेसची लढत भाजपाशी आहे. यापैकी २३ मतदारसंघांत २०१०च्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार विजयी झाले होते. - याशिवाय पक्षाला संयुक्त जनता दलाकडून अशा १२ जागा मिळाल्या आहेत जेथे गेल्या निवडणुकीत भाजपासोबत असलेल्या संजदचे उमेदवार विजयी झाले होते. २०१० साली काँग्रेसला ४ जागांवर विजय मिळाला होता. परंतु २०१४च्या पोटनिवडणुकीत भागलपूरची जागा ताब्यात आल्याने या पक्षाची सदस्य संख्या ५ झाली. सवर्ण आणि मागासवर्गीयांबद्दल लालूप्रसाद यादव यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. काँग्रेसचा समाजातील प्रत्येक वर्गाला सोबत घेण्यावर विश्वास आहे. पक्षासाठी सांप्रदायिकता आणि विकास हा मुख्य मुद्दा आहे.- प्रेमचंद्र मिश्रा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते