शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

सात लोकांना जिवंत जाळणा-याला मिळणार फाशीच, राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2018 16:13 IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाच कुटुंबातील सात जणांना जिवंत जाळणा-या व्यक्तीच्या दयेचा अर्ज फेटाळून लावला आहे. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर कोविंद यांच्याकडे पहिल्यांदाच दयेची याचिका दाखल करण्यात आली होती. बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर प्रखंड येथे ही क्रूर घटना 2006 रोजी घडली होती. ज्यात जगत राय नावाच्या नराधमानं म्हशींची चोरी केल्याच्या प्रकरणात विजेंद्र महतो आणि त्याच्या कुटुंबातील 6 जणांना जिवंत जाळलं होतं.महतो यानं सप्टेंबर 2005मध्ये म्हशींची चोरी झाल्याचा एक गुन्हा दाखल केला होता. ज्यात जगत राय, वजीर राय आणि अजय राय यांना आरोपी करण्यात आलं होतं. या आरोपींनी महतोवर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला होता. परंतु महतो यांनी गुन्हा काही मागे घेतला नाही. अखेर जगत रायनं महतोचं घर पेटवून दिलं. त्यात महतोची पत्नी आणि पाच मुलांचा भाजून मृत्यू झाला. आगीत होरपळल्यामुळे महतोंचाही काही महिन्यांनी मृत्यू झाला.या जळीत कांडात राय याला दोषी ठरवत स्थानिक न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानं सुनावलेली ही शिक्षा सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवली. अखेर राय यानं यासंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेसाठी याचिका दाखल केली. परंतु कोविंद यांनी ती याचिका फेटाळून लावली. राष्ट्रपती कार्यालयानं याबाबत गृह मंत्रालयाशीही विचारविनिमय केला. त्यानंतर रामनाथ कोविंद यांनी हा निर्णय घेतला. 

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंद