शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

समोर मृत्यू दिसल्यावर तो आईच्या आठवणीने गदगदला, पण घाबरला नाही!; दूरदर्शनच्या कॅमेरामनचा शहारे आणणारा व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 16:41 IST

छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे.

नवी दिल्ली - छत्तीसगडमधील दांतेवाडा जिल्ह्यात मंगळवारी नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दूरदर्शनच्या एका कॅमेरामनसह दोन जवानांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हा हल्ला झाला तेव्हाचा एक अंगावर शहारे आणणारा व्हि़डीओ समोर आला आहे. या हल्ल्यात बालंबाल बचावलेले दूरदर्शनचे सहाय्यक कॅमेरामन मोर मुकुट शर्मा यांनी हा व्हिडीओ चित्रित केला असून, त्यात हल्ला झाला तेव्हाची परिस्थिती आणि स्वत:ची झालेली मनोवस्था चित्रित केली आहे. हा व्हि़डीओ सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

मोर मुकुट शर्मा सांगतात की, "तीन पत्रकार आणि सुरक्षा दलांचे जवान असे मिळून दहा जण जात असताना शेतात लपलेल्या नक्षलवाद्यांनी अचानक हल्ला केला. अच्युतानंद साहू यांची दुचाकी सर्वात पुढे होती. हल्ला झाला तेव्हा त्यांची दुचाकी रस्त्यावर पडली. दरम्यान, आम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्याचा आसरा घेऊन लपलो. त्यावेळी आमच्यात आणि नक्षलवाद्यांमध्ये जेमतेम 25 ते 30 फुटांचे अंतर होते.''हा व्हिडीओ चित्रित करण्यामागची गोष्टही मोर मुकुट शर्मा यांनी सांगितली आहे. ""हल्ला झाला तेव्हा मला खूप तहान लागली होती. मात्र आता काहीच मिळू शकणार नाही, असे माझ्या सहकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा वाटले आता सगळे संपले आहे. समोर मृत्यू दिसत आहे. माझे सहकारी असलेल्या कॅमेरामनचा मृत्यू झाला होता. वाटले आपल्याकडे वेळ कमी आहे. म्हणून मी माझ्या जीवनातील शेवटचे क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेतला. मला आईची आठवण येत होती. मी रोज गीता वाचतो. त्यामुळे गीतेचे सार आठवून मी देवाचा धावा करू लागलो. व्हिडीओ चित्रित करून झाल्यानंतरही मी देवाचे नाव घेत होतो.", असे शर्मा म्हणाले.   हा व्हिडीओ अचानक बंद होतो. त्यामुळे तेव्हा तिथे नक्षलवादी आल्याची शंका वर्तवण्यात येत होती. मात्र त्याबाबत शर्मा सांगतात, "आम्ही जिथे लपलो होतो तिथे लाल मुंग्यांचे वारुळ होते. त्यातील मुंग्या अंगावरून फिरत असल्याने मला व्हिडीओ बंद करावा लागला. आम्ही जिथे लपलो होतो. तेथील झाडावर गोळ्या झाडून नक्षलवाद्यांनी त्या झाडाची चाळण केली होती. त्यामुळे जर मुंग्यांपासून बचावासाठी आम्ही हालचाल केली असती. तर नक्षलवाद्यांनी आम्हाला लक्ष्य बनवले असते."  "सुमारे 40 मिनिटे गोळीबार सुरू होता. असा भयानक आवाज मी केवळ चित्रपटांमध्येच ऐकला होता. शेकडो नक्षलवाद्यांनी आमच्यावर हल्ला केला असावा, असे आम्हाला वाटत होते. आमच्यासोबत केवळ सात जवान होते. त्यापैकी दोघे शहीद झाले. तर माझे सहकारी असलेले कॅमेरामन साहू यांचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर जे सैनिक मुख्य रस्त्यापर्यंत आले होते. त्यांनी मोर्चा सांभाळला. त्यानंतर नक्षलवाद्यांनी जंगलात पळ काढला." अशी माहिती मोर मुकुट शर्मा यांनी दिली. 

टॅग्स :Journalistपत्रकारChhattisgarhछत्तीसगड