शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

ईदच्या दिवशी काश्मीर अशांत, सुरक्षा दलांवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 6:35 AM

रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे.

श्रीनगर : रमजान ईदच्या दिवशी काश्मीर खोऱ्यात झालेल्या हिंसाचारात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, पाकिस्तानने सणाच्या दिवशीच सीमेवर केलेल्या गोळीबारात बिकास गुरुंग नावाचा जवान शहीद झाला आहे. ईदचा नमाज अदा करून झाल्यानंतर, राजधानी श्रीनगरसह अनंतनाग, तसेच अनेक शहरांमध्ये जमावाने दगडफेक सुरू केली. त्यात सुरक्षा दलाचे जवान गंभीर जखमी झाले आहेत.शिवाय श्रीनगर व अन्य शहरांत जमावाकडून इसिसचे झेंडे फडकावण्यात आले. तरुणांनी चेहºयांना रुमाल बांधले होते, पण त्यात लहान मुलांनाही सहभागी करून घेतले होते. या वेळी प्रथमच इतकी लहान मुले यात सहभागी झाली होती. श्रीनगर शहराबाहेर सीआरपीएफच्या पथकावरही दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यात दिनेश पासवान हा जवान गंभीर जखमी झाला असून, त्याला लष्कराच्या बदामी बागच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.>नौशेरा, अरनियातपाकचा गोळीबारनौशेरा सेक्टरमध्येनियंत्रण रेषेजवळ पाकच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला. अरनिया सेक्टरमध्येही पहाटे४ वाजता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. त्याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले.>यंदा वाघा बॉर्डरवर मिठाई वाटप नाहीअमृतसर : भारत व पाक यांच्यातील अतिशय तणावाच्या संबंधांमुळे ईदचा दिवस असूनही पंजाबच्या वाघा बॉर्डरवर दोन्ही देशांच्या जवानांनी एकमेकांना मिठाई दिली नाही. दरवर्षी दोन्ही देशाचे सैनिक मिठाई वाटून ईद साजरी करीत असतात.>अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्याकाश्मीरच्या अनंतनागमध्ये ईदनिमित्त नमाज अदा केल्यानंतर,काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर जोरदार दगडफेक केली. दगडफेक करणाºयांच्या हातात पाकिस्तान व इसिसचे झेंडे होते.हा जमाव पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता.दगडफेक सुरू झाल्याने सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दगडफेक सुरूच राहिल्याने जवानांनी हवेत गोळीबार केला. तिथे त्या वेळी ग्रेनेड फेकला गेला. त्यात एक तरुण ठार झाला. तेव्हापासून दिवसभर अनंतनागमध्ये तणाव होता. श्रीनगरमध्येही नमाज अदा केल्यानंतर जमावाने जोरदार दगडफेक केला.>जवानाच्या वडिलांचा इशारामाझ्या मुलाच्या मारेकºयांना ७२ तासांत ठार करा अन्यथाआपण स्वत:च मुलाच्या हत्येचा सूड घेऊ , असे शहीद जवान औरंगजेब यांच्या वडिलांनी सुरक्षा दले व पोलिसांना सांगितलेआहे. औरंगजेबचे वडील म्हणाले की, माझ्या मुलाला मारणाºया दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करायला सरकारला कोणी थांबविले आहे की काय? तीन दिवसांत त्यांच्यावर कारवाई न झाल्यास मी स्वत:च बदला घेईन.औरंगजेब यांचे वडील व काकाही सैन्यात होते. औरंगजेब यांच्या काकाला वीरमरण आले होते. औरंगजेब यांचा भाऊसुद्धा सैन्यात आहेत. मुलाच्या मृत्यूनंतर काही राजकीय नेत्यांनी जे राजकारण सुरू केले आहे, त्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर