शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सरकारसाठी दाऊद लापता!

By admin | Updated: May 6, 2015 03:16 IST

दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले.

केंद्राची संसदेत कबुली : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोलनवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले. मोदी सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी आणि काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी या मुद्द्यावर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत सरकारच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचा आरोप केला. कारण दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असून, पाकिस्तानने मात्र नेहमीच याचा इन्कार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेत आल्यानंतर दाऊदच्या मुसक्या बांधू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले. सरकारच्या या उत्तराने पाकिस्तानचा खोटा दावा खरा सिद्ध केला आहे, असाही त्यांचा आरोप होता. लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी हे धक्कादायक उत्तर दिले. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. तो कुठे आहे, हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरूकेली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह देशातील दहशतवादाच्या अनेक घटनांमध्ये आरोपी असलेला दाऊद आणि इतर दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न राय यांनी विचारला होता. दाऊद इब्राहिम कासकर हा मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा मुलगा. १९८0 च्या दशकात पोलिसाच्या या मुलाचा अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश झाला आणि आजतागायत त्याच्या नावाचा दबदबा कायम आहे. दरोड्यापासून सोन्याच्या तस्करीपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दाऊदने मुंबईहून दुबईला पलायन केले. मुंबईतील बेनामी मालमत्ता, बॉलीवूडमधील दहशत, बिल्डरांशी साटेलोटे या वेगवेगळ््या कारणांनी तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)दबाव वाढवासरकारने दाऊदला परत आणण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध नोटीस काढली आहे, परंतु अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. सरकारने दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत त्वरित कारवाई करण्याची विनंती संबंधित देशांना केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरीभारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपुर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती. याच दिवशी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले > टायगर मेमनसारख्या हस्तकांच्या मदतीने आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावरून १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अंदाज गुप्तचर यंत्रणांना आला. मात्र तोपर्यंत त्याने दुबई सोडून पाकिस्तानात धाव घेतली. > पाकिस्तानातूनही त्याने छोटा शकील आणि अबू सालेमसारख्या साथीदारांच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे, तर भारतातील वेगवेगळ््या शहरांत आपल्या टोळीच्या कारवाया सुरू ठेवल्या.