शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
कॅब कंपन्यांसाठी सरकारचा नवा नियम, पिक अवरमध्ये दुप्पट भाडं आकारू शकणार; बाईक टॅक्सीलाही मंजुरी
4
IND vs ENG: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या Playing XI मध्ये होणार 'हे' ४ महत्त्वाचे बदल
5
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
6
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
7
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
8
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
9
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
10
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
12
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
13
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
14
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
15
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
16
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
17
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
18
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
19
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
20
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!

सरकारसाठी दाऊद लापता!

By admin | Updated: May 6, 2015 03:16 IST

दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले.

केंद्राची संसदेत कबुली : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोलनवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले. मोदी सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी आणि काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी या मुद्द्यावर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत सरकारच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचा आरोप केला. कारण दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असून, पाकिस्तानने मात्र नेहमीच याचा इन्कार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेत आल्यानंतर दाऊदच्या मुसक्या बांधू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले. सरकारच्या या उत्तराने पाकिस्तानचा खोटा दावा खरा सिद्ध केला आहे, असाही त्यांचा आरोप होता. लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी हे धक्कादायक उत्तर दिले. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. तो कुठे आहे, हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरूकेली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह देशातील दहशतवादाच्या अनेक घटनांमध्ये आरोपी असलेला दाऊद आणि इतर दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न राय यांनी विचारला होता. दाऊद इब्राहिम कासकर हा मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा मुलगा. १९८0 च्या दशकात पोलिसाच्या या मुलाचा अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश झाला आणि आजतागायत त्याच्या नावाचा दबदबा कायम आहे. दरोड्यापासून सोन्याच्या तस्करीपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दाऊदने मुंबईहून दुबईला पलायन केले. मुंबईतील बेनामी मालमत्ता, बॉलीवूडमधील दहशत, बिल्डरांशी साटेलोटे या वेगवेगळ््या कारणांनी तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)दबाव वाढवासरकारने दाऊदला परत आणण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध नोटीस काढली आहे, परंतु अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. सरकारने दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत त्वरित कारवाई करण्याची विनंती संबंधित देशांना केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरीभारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपुर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती. याच दिवशी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले > टायगर मेमनसारख्या हस्तकांच्या मदतीने आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावरून १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अंदाज गुप्तचर यंत्रणांना आला. मात्र तोपर्यंत त्याने दुबई सोडून पाकिस्तानात धाव घेतली. > पाकिस्तानातूनही त्याने छोटा शकील आणि अबू सालेमसारख्या साथीदारांच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे, तर भारतातील वेगवेगळ््या शहरांत आपल्या टोळीच्या कारवाया सुरू ठेवल्या.