शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सरकारसाठी दाऊद लापता!

By admin | Updated: May 6, 2015 03:16 IST

दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले.

केंद्राची संसदेत कबुली : काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोलनवी दिल्ली : कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताच्या सुपुर्द करण्याची मागणी पाकिस्तानकडे आग्रहाने करणा-या केंद्र सरकारने मंगळवारी लोकसभेत मात्र आपल्याला दाऊदचा नेमका ठावठिकाणा माहीत नसल्याचे कबूल केले. मोदी सरकारच्या या स्पष्टीकरणामुळे नवा राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे डी. पी. त्रिपाठी आणि काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी या मुद्द्यावर सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत सरकारच्या या वक्तव्याने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताच्या प्रतिष्ठेला धक्का लागला असल्याचा आरोप केला. कारण दाऊद पाकिस्तानात असल्याचा दावा भारताकडून गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत असून, पाकिस्तानने मात्र नेहमीच याचा इन्कार केला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते गौरव गोगोई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्तेत आल्यानंतर दाऊदच्या मुसक्या बांधू, असे आश्वासन मोदी यांनी निवडणूक प्रचारात दिले होते, याचे स्मरण त्यांनी करून दिले. सरकारच्या या उत्तराने पाकिस्तानचा खोटा दावा खरा सिद्ध केला आहे, असाही त्यांचा आरोप होता. लोकसभेत नित्यानंद राय यांच्या प्रश्नाच्या लिखित उत्तरात गृहराज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी हे धक्कादायक उत्तर दिले. दाऊदच्या ठावठिकाण्याचा शोध अद्याप लागलेला नाही. तो कुठे आहे, हे कळल्यानंतर प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरूकेली जाईल, असे त्यांनी नमूद केले. मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेसह देशातील दहशतवादाच्या अनेक घटनांमध्ये आरोपी असलेला दाऊद आणि इतर दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे, असा प्रश्न राय यांनी विचारला होता. दाऊद इब्राहिम कासकर हा मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबलचा मुलगा. १९८0 च्या दशकात पोलिसाच्या या मुलाचा अंडरवर्ल्डमध्ये प्रवेश झाला आणि आजतागायत त्याच्या नावाचा दबदबा कायम आहे. दरोड्यापासून सोन्याच्या तस्करीपर्यंतच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या दाऊदने मुंबईहून दुबईला पलायन केले. मुंबईतील बेनामी मालमत्ता, बॉलीवूडमधील दहशत, बिल्डरांशी साटेलोटे या वेगवेगळ््या कारणांनी तो नेहमीच चर्चेत राहिला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)दबाव वाढवासरकारने दाऊदला परत आणण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि यासाठी पाकिस्तानवर दबाव वाढवावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.दाऊदविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध नोटीस काढली आहे, परंतु अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. सरकारने दहशतवादाशी संबंधित प्रकरणांमध्ये फरार आरोपींच्या प्रत्यार्पणाबाबत त्वरित कारवाई करण्याची विनंती संबंधित देशांना केली आहे. - केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरीभारताने दाऊदबद्दल माहितीचे अनेक दस्तऐवज यापूर्वीच पाकिस्तानला दिले आहेत. यात त्याच्या पाकिस्तानातील ठावठिकाण्यांचीही माहिती आहे. दाऊद भारतातून फरार असून, त्याला देशाकडे सुपुर्द करण्याचे आवाहन पाकिस्तानला वेळोवेळी करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी २७ डिसेंबर २०१४ रोजी लखनौत बोलताना दिली होती. याच दिवशी गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिल्लीत बोलताना दाऊदविरुद्ध सबळ पुरावे असून, त्याला भारताकडे सोपविण्याची मागणी पाकिस्तानकडे केली असल्याचा दावा केला होता. मुंबईत बॉम्बस्फोट घडवले > टायगर मेमनसारख्या हस्तकांच्या मदतीने आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावरून १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट मालिका घडवली आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा अंदाज गुप्तचर यंत्रणांना आला. मात्र तोपर्यंत त्याने दुबई सोडून पाकिस्तानात धाव घेतली. > पाकिस्तानातूनही त्याने छोटा शकील आणि अबू सालेमसारख्या साथीदारांच्या माध्यमातून केवळ मुंबईतच नव्हे, तर भारतातील वेगवेगळ््या शहरांत आपल्या टोळीच्या कारवाया सुरू ठेवल्या.