शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुरान्तो एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरांचा सत्कार; शेकडो प्रवाशांचे दोघांनी वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:58 IST

मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.

नवी दिल्ली : मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.१० दिवसांत चार गाड्या रुळांवरून घसरल्यानंतर टीका होत असताना, रेल्वेने या दोन कर्तव्यदक्ष कर्मचाºयांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ‘दुरान्तो’चे ड्रायव्हर वीरेंद्र सिंग (५२ वर्षे) व सहाय्यक ड्रायव्हर अभय कुमार पाल (३२) यांचा रेल्वे बार्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी प्रशस्तिपत्र व अनुक्रमे १० हजार व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव केला. हे दोघेही मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत. या दोघांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता व प्रसंगावधान राखून ते खरे ‘रेल्वेमन’ असल्याची प्रचिती दिली, असे लोहाणी म्हणाले.रेल्वच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले गेले की, मोठे वळण व मुसळधार पाऊस, यामुळे रुळांवर दरड कोसळल्याचे ऐनवेळी लक्षात येताच या दोघांनी इमर्जन्सी ब्रेक लावले. परिणामी, रुळांवर कोसळलेल्या दगड-मातीवर गाडी येऊन आपटली, तेव्हा तिचा वेग खूपच कमी झाला होता. अचानक ब्रेकमुळे इंजिन व नऊ डबे घसरले, पण मोठा अनर्थ टळला. तशा आणीबाणीच्या वेळीही कुमार व पाल यांनी मन शांत ठेवून नियंत्रण कक्षाशी लगेच संपर्क साधला आणि अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वीजपुरवठा तत्काळ बंद करायला लावला. त्यामुळेही अपघाताचा संभाव्य धोका कमी झाला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे