शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
4
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
5
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
6
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
7
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
8
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
9
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
10
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
11
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
12
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
13
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
14
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
15
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
16
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
17
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
18
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
19
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

धाडसी आबा -१

By admin | Updated: February 16, 2015 23:55 IST

नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण

नक्षलवाद्यांची उडविली दाणादाण
आबा शिरले होते थेट मृत्यूच्या गुहेत : पोलिसांनाही भरले कापरे
नागपूर : १२ महिन्यांच्या काळात तीन घातपात घडवून ५३ पोलिसांचे बळी घेतल्यामुळे गडचिरोलीतील पोलीस दल अक्षरश: थरारले होते. या काळात आर.आर. पाटील पालकमंत्र्याच्या रूपाने ढाण्या वाघासारखे नक्षल्याच्या गुहेत शिरले आणि पुढच्या चार वर्षांत त्यांनी नक्षलवाद्यांची अक्षरश: दाणादाण उडवून दिली. आबांच्या निधनाने कर्तव्यकठोर पोलीस अधिकाऱ्यांनाही आठवणींचा गहिवर दाटून आला आहे. अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संवेदनशील तेवढ्याच धाडसी आबांच्या आठवणींचे काही थरारक किस्से आज उघड केले.
२००९-१० मध्ये नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात प्रचंड हैदोस घातला. चुहामाकड, हत्तीटोला आणि मरकेगाव परिसरात मोठ्या घातपाती घटना घडविल्या. या अवघ्या तीन घटनांमध्ये नक्षलवाद्यांनी ५३ पोलिसांचे बळी घेतले. नक्षल्यांच्या क्रौर्यामुळे पोलीस दल अक्षरश: शहारले होते. अशात आबांनी गडचिरोलीचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी तेथे पोलीस अधीक्षक जयकुमार आणि अमितकुमार सैनी जि.प.चे सीईओ म्हणून कार्यरत होते. धानोरा तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एक अशीच घटना घडली. पावसामुळे बस किंवा मोठे वाहन जायला मार्ग नव्हता. तेथे जाणे प्रचंड धोकादायक आहे, नक्षलवादी घात लावून बसले असू शकतात, असे सांगूनही आबांनी चक्क मोटरसायकलवरच घटनास्थळ गाठले. त्यांच्या धाडसाला त्यावेळी सर्वांनीच सलाम केला.
यानंतर पोलीस अधीक्षक म्हणून वीरेश प्रभू रुजू झाले. सिरोंचा, एटापल्ली, कोरची, चामोर्शी, मूलचेरा भागात नक्षल्यांचा हैदोस सुरू होता. हत्या, अपहरण, जाळपोळ, धमक्यांमुळे या भागातील नागरिक (अन् पोलिसही) धास्तावलेले होते. कुणी तिकडे फिरकण्याची तसदी घेत नव्हते. आबांनाही पोलिसांनी या भागात फिरण्यास मनाई केली. मात्र, आबांनी हसत हसतच पोलीस अधीक्षक प्रभूंना सोबत घेतले अन् दोन दिवसात सहा तालुक्यांचा दौरा केला. नागरिकांना आणि पोलिसांनाही आश्वस्त केले.
---
जोड आहे