शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

"आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 15:04 IST

मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले

नवी दिल्ली - अमेरिका बेस्ड एनआरआय उद्योगपती आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते दर्शन सिंह धालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनी १५० लोकांसमोर माझी माफी मागितली आणि आमच्याकडून मोठी चूक झाली असं म्हटल्याचं उद्योगपती दर्शन सिंह धालीवाल यांनी सांगितले आहे. 

मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. धालीवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान म्हणाले, आमच्याकडून मोठी चूक झाली, तुम्हाला परत पाठवलं. परंतु तुमचा मोठेपणा आहे जे आमच्या सांगण्यावरून तुम्ही परत आला असं त्यांनी म्हटलं. 

राजधानी दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात लंगर व्यवस्था करण्याच्या आरोपावर दर्शन सिंह धालीवाल यांना २३- २४ ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली एअरपोर्टवरून बाहेर पाठवले होते. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्यानंतर धालीवाल यांनी ही मुलाखत दिली. एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी एका शिख शिष्टमंडळाच्या भेटीवेळी हा संवाद झाला. या बैठकीत जगातील सर्व शिख व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. इंजिनिअरींग शिक्षण घेतल्यानंतर १९७२ मध्ये अमेरिकेला गेलेले धालीवाल अमेरिकेत फ्यूल स्टेशन चालवतात. 

अधिकाऱ्यांनी दिले होते २ पर्यायफ्लाईटमधून परत पाठवण्याच्या त्या घटनेचा उल्लेख करत दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं की, एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी मला २ पर्याय दिले होते. पहिला लंगर थांबवा आणि शेतकऱ्यांसोबत मध्यस्थी करा आणि दुसरा पर्याय परत अमेरिकेला जाण्याचा. माणुसकीच्या दृष्टीने मी शेतकरी आंदोलनात माझ्याकडून लंगरची व्यवस्था केली होती. डिसेंबर २०२१ रोजी जेव्हा शेतकरी दिल्ली आले होते तेव्हा मध्यरात्री पाऊस सुरू झाला. मी हा व्हिडिओ पाहिला. थंडीत ते पाण्यात झोपत आहेत. तेव्हा मला त्यांची मदत करावी वाटलं. त्यासाठी मी लंगर आणि राहण्यासाठी टेंटची सोय केली. लोकांच्या हितासाठी मी हे काम केले. त्यात कुठलेही राजकारण नव्हते असं त्यांनी सांगितले. 

भारत सरकारने मला परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि आज नियतीने मला पुन्हा परत बोलावून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला. ही देवाची कृपा आहे. पंजाब सरकारकडून अनेक पुरस्कार मिळालेत. परंतु केंद्र सरकारकडून हा पहिलाच पुरस्कार असल्याचं दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmers Protestशेतकरी आंदोलन