दर्डा महत्त्वाचे- सुधारित- याआधीची बातमी जोडलेली आहे. भारत अतिरेकी संघटनांच्या कायम निशाण्यावर? कटांची माहितीच नाही : गृह राज्यमंत्री चौधरी यांची विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कबुली
By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST
नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.
दर्डा महत्त्वाचे- सुधारित- याआधीची बातमी जोडलेली आहे. भारत अतिरेकी संघटनांच्या कायम निशाण्यावर? कटांची माहितीच नाही : गृह राज्यमंत्री चौधरी यांची विजय दर्डा यांच्या प्रश्नावर कबुली
नवी दिल्ली : भारत दीर्घकाळापासून अतिरेकी संघटनांच्या निशाण्यावर आहे. अनेक ठिकाणी स्फोट घडवून आणण्याच्या अतिरेक्यांच्या कोणत्याही कटाबाबत गुप्तचर यंत्रणाकडे विशिष्ट अशी माहिती उपलब्ध नाही, अशी कबुली गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी राज्यसभेत दिली. खा. विजय दर्डा यांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता.3 सप्टेंबर 2014 रोजी अल-कायदाच्या शेख अयाम अल जवाहिरी यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला होता. त्यात भारतीय उपखंडात अल-कायदाची ‘एक्यूआयएस’ ही नवी शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. 29 जून 14 रोजी इंटरनेटवर अपलोड करण्यात आलेल्या एका व्हिडिओत अबू बकर अल बगदादी याने भारतासह विविध देशांमधील मुस्लिमांची कथित दुर्दशा मांडली होती. विविध अतिरेकी संघटना भारताच्या कानाकोपर्यात स्फोट घडविण्याची धमकी देत आल्या आहेत. अशा संघटनांची ओळख पटवण्यात आली काय? बर्दवान स्फोटाचा गुंता सुटला आहे काय? या स्फोटांमधील दोषींवर कोणती कारवाई करण्यात आली? असा प्रश्न खा. दर्डा यांनी विचारला होता. त्यावर चौधरी म्हणाले की, राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या स्फोटाचा तपास करीत आहे. आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले, जखमी झालेले लोक जमात-उल-मुजाहिदीन बांगला देश (जेएमबी) सदस्य होते.--------------बँक एटीएमच्या लुटीची आकडेवारी नाही गेल्यावर्षी देशभरातील किती बँक एटीएममध्ये लुटमारीच्या घटना घडल्या याची माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे गृह राज्यमंत्री हरिभाई परथीभाई चौधरी यांनी अन्य एका उत्तरात दिली. बँकांच्या एटीएमवर होणारी चोरी किंवा दरोड्याच्या घटनांची आकडेवारी केंद्रीय स्तरावर ठेवली जात नाही. 2012 मध्ये बँकांवर दरोड्याच्या एकूण 29 घटना घडल्या. लुटमारीचे 191 गुन्हे दाखल झाले. 2013 मध्ये दरोड्याची 28 प्रकरणे तर लुटमारीच्या 48 घटनांची नोंद झाली, असे चौधरी यांनी लेखी उत्तरात सांगितले. अलीकडेच बँक एटीएममध्ये लूट आणि आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सरकारला याबाबत माहिती आहे काय? बँक एटीएम लुटण्याच्या किती घटना घडल्या याची सरकारकडे माहिती उपलब्ध आहे काय? लुटण्यात आलेल्या रकमेचा भारतविरोधी मोहिमेसाठी वापर केला जातो काय? याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा खा. दर्डा यांनी व्यक्त केली होती.