शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 07:39 IST

१५.४१ लाख कोटी बाद केले; १५.३१ लाख कोटी परत आले, नव्या नोटांसाठी १२,८७७ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : नोटाबंदीवेळी चलनातून बाद केलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये बँकेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी एकूण १७.९७ लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपयांच्या होत्या. यातील ३ लाख कोटी रुपये ‘काळा पैसा’ असल्याचे सांगून ती रक्कम चलनात येणार नाही असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने तो फोल ठरला आहे.

नोटाबंदीनंतर (नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७) रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले. २०१७-१८ मध्येही रिझर्व्ह बँकेला नोटांच्या छपाईपोटी ४,९१२ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजे १२,८७७ कोटी रुपयांचा नव्या नोटांसाठी खर्च आला आहे. रिझर्व्ह बँकेने या अहवालात महागाई दरात वाढीची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१८-१९ च्या अखेरीस महागाई दर ४.९ टक्के व २०१९-२० च्या सुरूवातीला ५ टक्क्यांवर जाईल. तसेच आर्थिक विकास दर (जीडीपी) ६.७ वरुन ७.४ पोहोचला आहे.निश्चलीकरण फेलनोटाबंदीतील ३ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नाहीत, असा दावा केंद्र सरकारने केला होता. वास्तवात सर्व रक्कम परत आली व निश्चलीकरण फक्त १३ हजार कोटी रुपयांचे झाले, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या अयशस्वी नोटाबंदीमुळे देशाचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. १०० नागरिकांना प्राण गमवावे लागले. हजारो छोटे उद्योग बंद पडले. १५ कोटींचा रोजगार बुडाला, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.99.30%रक्कम बँकेत परत

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण