शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

नोटाबंदीच्या ‘डोंगरा’तून निघाला ‘उंदीर’, वाचा धक्कादायक आकडेवारी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 07:39 IST

१५.४१ लाख कोटी बाद केले; १५.३१ लाख कोटी परत आले, नव्या नोटांसाठी १२,८७७ कोटी रुपयांचा खर्च

मुंबई : नोटाबंदीवेळी चलनातून बाद केलेल्या १५.४१ लाख कोटी रुपयांपैकी १५.३१ लाख कोटी रुपये बँकेत परत आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात समोर आले आहे. केवळ १०,७२० कोटी रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे आल्या नाहीत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ ला ५०० व १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. त्यावेळी एकूण १७.९७ लाख कोटी रुपये चलनात होते. त्यापैकी ८६ टक्के नोटा ५०० व १००० रुपयांच्या होत्या. यातील ३ लाख कोटी रुपये ‘काळा पैसा’ असल्याचे सांगून ती रक्कम चलनात येणार नाही असा दावा सरकारने केला होता. मात्र, रिझर्व्ह बँकेच्या अहवालाने तो फोल ठरला आहे.

नोटाबंदीनंतर (नोव्हेंबर २०१६ ते मार्च २०१७) रिझर्व्ह बँकेला ५०० व २००० रुपयांच्या नवीन नोटांच्या छपाईसाठी ७,९६५ कोटी रुपये खर्च करावे लागले. २०१७-१८ मध्येही रिझर्व्ह बँकेला नोटांच्या छपाईपोटी ४,९१२ कोटी रुपये खर्च करावे लागले. म्हणजे १२,८७७ कोटी रुपयांचा नव्या नोटांसाठी खर्च आला आहे. रिझर्व्ह बँकेने या अहवालात महागाई दरात वाढीची शक्यताही व्यक्त केली आहे. २०१८-१९ च्या अखेरीस महागाई दर ४.९ टक्के व २०१९-२० च्या सुरूवातीला ५ टक्क्यांवर जाईल. तसेच आर्थिक विकास दर (जीडीपी) ६.७ वरुन ७.४ पोहोचला आहे.निश्चलीकरण फेलनोटाबंदीतील ३ लाख कोटी रुपये बँकिंग प्रणालीत परत येणार नाहीत, असा दावा केंद्र सरकारने केला होता. वास्तवात सर्व रक्कम परत आली व निश्चलीकरण फक्त १३ हजार कोटी रुपयांचे झाले, अशी टीका माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. या अयशस्वी नोटाबंदीमुळे देशाचे २.२५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. १०० नागरिकांना प्राण गमवावे लागले. हजारो छोटे उद्योग बंद पडले. १५ कोटींचा रोजगार बुडाला, असे चिदंबरम यांनी ट्विटरवर म्हटले आहे.99.30%रक्कम बँकेत परत

टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरण