शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

दलित अत्याचारांत भाजपाचेच लोक!

By admin | Updated: August 12, 2016 04:50 IST

गोरक्षणाच्या वा अन्य कोणत्याही कारणास्तव दलितांवर झालेले अत्याचार सहन केले जाणार नाहीत. असे अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत

शीलेश शर्मा,  नवी दिल्ली गोरक्षणाच्या वा अन्य कोणत्याही कारणास्तव दलितांवर झालेले अत्याचार सहन केले जाणार नाहीत. असे अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी गुरुवारी लोकसभेत केले. मात्र, गोरक्षणाच्या नावाखाली तुमच्या पक्षाचे लोकच दलितांवर अत्याचार करण्यात गुंतले असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप विरोधी सदस्यांनी सरकारवर केला. तसेच दलितांवरील अत्याचार थांबवायचे असतील, तर गोरक्षकांच्या संघटनांवरच बंदी घालावी, अशी मागणी विरोधकांनी केली आणि सरकारच्या उत्तरामुळे समाधान न झाल्यामुळे काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला. गोरक्षणाच्या नावाखाली काही समाजकंटक दलितांवर अत्याचार करत असल्याचेही राजनाथसिंग म्हणाले. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच विधान केले होते. दलितांवरील अत्याचार ही मानसिक विकृती असून, हे अत्याचार थांबवणे हे आव्हान आहे, असेही गृहमंत्र्यांनी बोलून दाखवले. मात्र केंद्रात आणि अनेक राज्यांत भाजपाचे सरकार आल्यापासूनच दलितांवरील अत्याचार वाढले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावर गेल्या ७0 वर्षांत जे अत्याचार थांबवणे तुम्हाला जमले नाही, ते दोन वर्षांत थांबले नाहीत, म्हणून आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे, असे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले. दलित अत्याचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलायला का तयार नाहीत, असा सवालही विरोधी सदस्यांनी केला. त्यावर पंतप्रधान बोलले वा नाही बोलले, तरी अत्याचार थांबावेत, अशीच त्यांची कृती आहे, असा खुलासा राजनाथसिंग यांनी केला.दलितांचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेसने कायमच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी विरोधकांवर केली, तर देशातील उजव्या विचारांच्या आणि गोरक्षकांच्या नावाने दलितांवर हल्ले करणाऱ्या व्यक्ती व संघटना यांना सरकार आणि भाजपाचा पाठिंबा आहे, असा आरोप काँग्रेसचे के. एच. मुनियप्पा यांनी केला. भाजपा सत्तेवर आल्यापासून दलित आणि आदिवासींमध्ये भीती व दहशतीचे वातावरण असल्याची टीकाही त्यांनी केली. अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षाचर्चेत भाग घेणाऱ्या जवळपास प्रत्येक विरोधी सदस्याने गुजरातच्या उना गावात दलितांना झालेल्या अमानुष मारहाणीचा उल्लेख करीत गोरक्षकांच्या सर्व संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना दलितांवर इतके अत्याचार होत नव्हते, याचा उल्लेख करीत, सध्याच्या अत्याचारांना आताचे सरकारच कारणीभूत असल्याचा दावा मुनियप्पांनी केला. हे सरकार आल्यापासून दलित अत्याचारातील आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण खाली आल्याचेही काही सदस्यांनी नमूद केले. सहा तास चाललेल्या चर्चेत माहिती व प्रसारणमंत्री व्यंकय्या नायडू यांनीही सरकारची बाजू जोरात मांडली. भाजपाचे उदित राज, भर्तुहारी मेहताब (बिजद), सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस) आदी सदस्यांनी भाग घेतला. रोज देशात किमान एका दलित महिलेवर बलात्कार होत आहे आणि प्रत्येक अठरा मिनिटाला दलितांना अत्याचाराला सामोरे जावे लागते. ३७.८ टक्के दलित विद्यार्थ्यांना सरकारी शाळांमध्ये वेगळे बसवले जाते आणि २४.५ टक्के दलितांना पोलीस ठाण्यातही प्रवेश दिला जात नाही. हे माहीत असूनही केंद्र व राज्यातील भाजपा सरकार काहीच कारवाई करत नाही.- पी. के. बिजू , माकप