शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दलाई लामा कार्ड भारताला पडेल महागात ! चीनचा संताप

By admin | Updated: April 21, 2017 18:16 IST

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने त्यांच्याविरोधात वापरलेले दलाई लामा कार्ड चांगलेच झोंबले

ऑनलाइन लोकमत
पेईचिंग, दि. 21 - आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने त्यांच्याविरोधात वापरलेले दलाई लामा कार्ड चांगलेच झोंबले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांच्या केलेल्या नामांतराविरोधात भारताने दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका करत चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी  दलाई लामांचा चिनविरोधात वापर सुरू ठेवला तर त्याची जबर किंमत भारताला मोजावी लागेल अशी धमकी दिली आहे. 
चीनच्या तिबेटवरील आक्रमणानंतर भारतात विस्थापित झालेले बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशाचा दौरा करण्याची परवानगी देत भारताने चिनी ड्रॅगनच्या शेपटीवर पाय ठेवला होता. तेव्हापासून चवताळलेल्या चीनने भारताविरोधात कारस्थानांना सुरुवात केली आहे. त्यानंतर चीनने अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचे नामांतर केले होतो. तर भारताने चीनचे हे पाऊल मुर्खपणाचे आहे, अशी टीका  भारताने केली होती. 
या टीकेला चीनमधील सरकारी वृत्तपत्राने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.  भारताकडून वापरण्यात येत आहे दलाई कार्ड, चीनसोबत क्षेत्रीय विवाद चिघळला, अशा शीर्षकाखाली एक लेख चीनच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. त्यात चीनने दक्षिण तिबेटमधील काही ठिकाणांचे नामांतरा का केले याचा विचार भारताने केला पाहिजे. केवळ दलाई लामा सांगतात म्हणून अरुणाचल प्रदेश भारताचा होऊ शकत नाही, असे या लेखात म्हटले आहे. तसेच भारताकडून अशा कुरापती चालू राहिल्या तर त्याची भारताला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही चिनी वृत्तपत्राने दिला आहे.