शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: May 8, 2017 01:35 IST

मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षांत दर दुसऱ्या दिवशी दहशतवादी घटना घडल्या असून, २०१२ ते २०१६ दरम्यान घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद आणि ९० निरपराध नागरिक ठार झाले.माहिती अधिकार कायद्यातहत गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या बाजूने हल्ला करण्याच्या ४०५ घटना घडल्या. यात दहा सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. २०१६ मध्ये नियंत्रणरेषेसह इतर ठिकाणी अशा ४४९ घटना घडल्या. यात १३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी घटना घडल्या आणि त्यात किती जवान शहीद झाले व किती नागरिक मारले गेले, याची माहिती विचारण्यात आली होती. पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत आहे, असे सेवानिवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी सांगितले. आता तर नवीन प्रकार सुरू झाला आहे. सुरक्षा दले जेव्हा दहशतवाद्यांना घेरतात, तेव्हा सोशल मीडियावर संंदेश पाठवून लोक त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे सुरक्षा दलाला कारवाई करणे कठीण होते. (वृत्तसंस्था)२०१२ ते २०१६ या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. या अवधीत सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत ५०७ दहशतवादी ठार झाले. २०१२ मध्ये २२० घटनांत १५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले, तर सुरक्षा दलाने प्रतिहल्ला करून ७२ दहशतवाद्यांचा खात्मा केला.२०१३ मध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या १७० घटना घडल्याची माहिती समोर आली असून, यात ५२ जवान शहीद, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने चोख उत्तर देत ६७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. २०१४ मध्ये अशा २२२ घटना घडल्या असून, यात ४७ जवान शहीद, तर २८ नागरिकांचा बळी गेला. सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ११० दहशतवादी मारले गेले. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाही हिंसाचाराच्या ३२२ घटना घडल्या; यात ८२ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने १५० दहशतवाद्यांना खात्मा केला.