शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

पाकिस्तानकडून दररोज शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Updated: May 8, 2017 01:35 IST

मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

नवी दिल्ली : मागच्या दोन वर्षांत (२०१५-२०१६) जम्मू-काश्मीरस्थित नियंत्रणरेषेलगत दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. तसेच गेल्या पाच वर्षांत दर दुसऱ्या दिवशी दहशतवादी घटना घडल्या असून, २०१२ ते २०१६ दरम्यान घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद आणि ९० निरपराध नागरिक ठार झाले.माहिती अधिकार कायद्यातहत गृहमंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१५ मध्ये नियंत्रणरेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करून पाकिस्तानच्या बाजूने हल्ला करण्याच्या ४०५ घटना घडल्या. यात दहा सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. २०१६ मध्ये नियंत्रणरेषेसह इतर ठिकाणी अशा ४४९ घटना घडल्या. यात १३ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. गेल्या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये किती दहशतवादी घटना घडल्या आणि त्यात किती जवान शहीद झाले व किती नागरिक मारले गेले, याची माहिती विचारण्यात आली होती. पाकिस्तान सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध करीत आहे, असे सेवानिवृत्त मेजर जनरल जी.डी. बक्षी यांनी सांगितले. आता तर नवीन प्रकार सुरू झाला आहे. सुरक्षा दले जेव्हा दहशतवाद्यांना घेरतात, तेव्हा सोशल मीडियावर संंदेश पाठवून लोक त्या ठिकाणी जमा होतात. त्यामुळे सुरक्षा दलाला कारवाई करणे कठीण होते. (वृत्तसंस्था)२०१२ ते २०१६ या पाच वर्षांत जम्मू-काश्मीरमध्ये घडलेल्या १,१४२ दहशतवादी घटनांत २३६ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. या अवधीत सुरक्षा दलाशी उडालेल्या चकमकीत ५०७ दहशतवादी ठार झाले. २०१२ मध्ये २२० घटनांत १५ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले, तर सुरक्षा दलाने प्रतिहल्ला करून ७२ दहशतवाद्यांचा खात्मा केला.२०१३ मध्ये दहशतवादी हिंसाचाराच्या १७० घटना घडल्याची माहिती समोर आली असून, यात ५२ जवान शहीद, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने चोख उत्तर देत ६७ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. २०१४ मध्ये अशा २२२ घटना घडल्या असून, यात ४७ जवान शहीद, तर २८ नागरिकांचा बळी गेला. सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत ११० दहशतवादी मारले गेले. २०१६ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाही हिंसाचाराच्या ३२२ घटना घडल्या; यात ८२ सुरक्षा कर्मचारी शहीद झाले, तर १५ नागरिक ठार झाले. सुरक्षा दलाने १५० दहशतवाद्यांना खात्मा केला.