शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:46 IST

'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे.

'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे. शेकडो कोटी रुपयांची पिके पाण्याखाली गेली आहेत. या वादळाचा सर्वात मोठा तडाखा तेलंगणाला बसला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि संपूर्ण तेलंगणा राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या वारंगल जिल्ह्यातच आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मोंथाने घेतला १२ लोकांचा बळी 

मोंथा चक्रीवादळामुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपत (३०), रमाक्का (८०), अनिल (३०), कृष्णमूर्ती (७०), नागेंद्र (५६), श्रीनिवास (६३), रजिथा (३५), सूरम्मा (७२), प्रणय (३०), कल्याण (२५), श्रव्य (१८) आणि सुरेश (३४) अशी मृतांची नावे आहेत. हणमकोंडा जिल्ह्यातील इनवेलु येथे आणखी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. या भागात राहणारे प्रणय आणि कल्याण हे पती-पत्नी पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे जोडपे सिद्धिपेट जिल्ह्यातील अक्कनपेट येथे परतत असताना एका कल्व्हर्टवरून वाहणाऱ्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

रेल्वे रुळांवर पाणी साचले, वाहतूक विस्कळीत!

मोंथा चक्रीवादळामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे प्रशासन सतर्क झाले असून, सखल भागातील लोकांना बाहेर काढून मदत छावण्यांमध्ये हलवले आहे.

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त!

आपत्ती निवारण पथके एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके मदत कार्यात सतत गुंतलेली आहेत. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तेलंगणातील वारंगल, हनमकोंडा, सिद्दीपेट आणि इतर जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. मोंथा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठे नुकसान होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Montha Cyclone Devastates Telangana: 12 Dead, Rail, Roads Blocked

Web Summary : Cyclone Montha caused havoc in Telangana, claiming 12 lives. Heavy rains flooded rail tracks and roads, disrupting transportation. Farmers suffered significant crop losses. Rescue operations are underway in affected areas, with teams working to evacuate people and provide assistance.
टॅग्स :TelanganaतेलंगणाNatural Calamityनैसर्गिक आपत्ती