शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
4
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
5
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
6
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
7
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
8
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
9
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
10
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
11
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
12
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
13
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
14
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
15
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
16
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
17
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
18
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
19
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
20
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर

तेलंगणामध्ये मोंथा वादळाचा कहर, १२ जणांचा मृत्यू; मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी, रस्तेही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:46 IST

'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे.

'मोंथा' वादळाने केवळ जनजीवनच नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य नागरिकांचेही मोठे नुकसान केले आहे. शेकडो कोटी रुपयांची पिके पाण्याखाली गेली आहेत. या वादळाचा सर्वात मोठा तडाखा तेलंगणाला बसला आहे. मोंथा चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू आणि संपूर्ण तेलंगणा राज्यात आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. जुन्या वारंगल जिल्ह्यातच आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मोंथाने घेतला १२ लोकांचा बळी 

मोंथा चक्रीवादळामुळे आतापर्यंत १२ लोकांचा मृत्यू झाला आहे. संपत (३०), रमाक्का (८०), अनिल (३०), कृष्णमूर्ती (७०), नागेंद्र (५६), श्रीनिवास (६३), रजिथा (३५), सूरम्मा (७२), प्रणय (३०), कल्याण (२५), श्रव्य (१८) आणि सुरेश (३४) अशी मृतांची नावे आहेत. हणमकोंडा जिल्ह्यातील इनवेलु येथे आणखी एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. या भागात राहणारे प्रणय आणि कल्याण हे पती-पत्नी पुराच्या पाण्यात वाहून गेले. हे जोडपे सिद्धिपेट जिल्ह्यातील अक्कनपेट येथे परतत असताना एका कल्व्हर्टवरून वाहणाऱ्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

रेल्वे रुळांवर पाणी साचले, वाहतूक विस्कळीत!

मोंथा चक्रीवादळामुळे रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. या वादळामुळे प्रशासन सतर्क झाले असून, सखल भागातील लोकांना बाहेर काढून मदत छावण्यांमध्ये हलवले आहे.

शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त!

आपत्ती निवारण पथके एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके मदत कार्यात सतत गुंतलेली आहेत. या चक्रीवादळामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडला आहे. तेलंगणातील वारंगल, हनमकोंडा, सिद्दीपेट आणि इतर जिल्ह्यांमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. मोंथा चक्रीवादळामुळे दक्षिण भारतातील राज्यांमध्ये मोठे नुकसान होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Montha Cyclone Devastates Telangana: 12 Dead, Rail, Roads Blocked

Web Summary : Cyclone Montha caused havoc in Telangana, claiming 12 lives. Heavy rains flooded rail tracks and roads, disrupting transportation. Farmers suffered significant crop losses. Rescue operations are underway in affected areas, with teams working to evacuate people and provide assistance.
टॅग्स :TelanganaतेलंगणाNatural Calamityनैसर्गिक आपत्ती